शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जळगावची घटना महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी – धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:51 IST

जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई : जळगावमधील घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंकीत करणारी असून यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

जळगाव जिल्हयातील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात मातंग समाजातील दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. या अमानवी घटनेनंतर राज्यभरातून संतापाच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

जळगावमध्ये जो प्रकार घडला तो पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. जळगाव जिल्हयातील मातंग सामाजाच्या काही तरुणांवर क्षुल्लक कारणावरुन ज्यापध्दतीने नग्न करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला तो या शाहु,फुले,आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील पुरोगामीत्वाला काळीमा फासणारा आहे.

 मागील तीन-चार वर्षात महाराष्ट्रात आणि देशात वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटना सरकार पुरस्कृत आहेत की काय किंवा या सरकारमध्ये काहीजणांची अशापध्दतीने जातीवाद करायची हिंमत वाढते आहे. त्यामुळे याला सरकार जबाबदार आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

 जळगावच्या या अमानवी घटनेचा त्यांनी जाहीर निषेध केला असून कुठेतरी आता आपल्या सगळ्या प्रयत्नातूनच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं पुरोगामीत्व जिवंत ठेवावं लागणार आहे. शाहु, फुले, आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र अबाधित रहावा यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केले आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे