शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

By admin | Updated: February 26, 2015 02:12 IST

अगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का? नगं बाबा येवू तू

हेमंत कुलकर्णी, नाशिकबया बया माझ्या गावी, आज परधान आलापरधान कशी म्हणू, राजा तोच रयतेला।।अशा डौलडांगोऱ्यात, त्येची झाली गावफेरीअसा दादला देरे द्येवा, मनी म्हणतात पोरी।।-कुसुमाग्रजअगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का?नगं बाबा येवू तू ,पाहत्यात ना शरदबाबू -कुसुमाग्रजांची स्वयंघोषित बाळे शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन, म्हणूनच राजभाषा दिन आणि म्हणूनच यंदा जनस्थान साहित्य पुरस्कार वितरण दिन. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अनिवासी नाशिककर अध्यक्ष (ही परंपरा अखंडित सुरू आहे़) मधु मंगेश कर्णिक यांच्या हातांनी अरुण साधू यांना जनस्थानाची बाहुली द्यायची आणि कार्यक्रम उरकून घ्यायचा, हा तूर्तास प्रतिष्ठानात मांड ठोकून बसलेल्या आणि कुसुमाग्रजांशी वा त्यांच्या साहित्याशी दूरान्वयानेही संबंध न आलेल्या वा त्यांनीच तो कटाक्षाने येऊ न दिलेल्या कारभाऱ्यांचा मानस. तात्यांनी स्वत:च जनस्थान आणि गोदावरी गौरव या दोन आडसाली पुरस्कार योजना आखून दिलेल्या असल्याने व कुसुमाग्रज स्मारकात संध्याकालीन शीत हवा खाण्याची सोय अबाधित राखायची असल्याने पुरस्कारांचे लोढणे ओढत राहण्याखेरीज कारभाऱ्यांना गत्यंतर नाही. त्यामुळं पटापटा आवरून मोकळे होऊन घ्या, हा त्यांचा व्यावहारिक विचार. पण कसचं काय, यंदा मोठी गडबडच झाली. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट फोन. कार्यक्रम कोणत्या वेळी आहे, (सायंकाळी सहा म्हणजे सहानंतर कधीही) शीएमसाहेबांना यायचं आहे, जरा वेळ अ‍ॅडजस्ट करता येईल तर बघा. साऱ्या कारभाऱ्यांचे हात कपाळाला. ह्ये काय आता नवंच! अशी काही परंपरा नाय! आम्ही गावभर निमंत्रणं पाठवली, तसं एक मंत्रालयातही पाठवलं. परवाच्या शनिवारी शीएम नाशकात आले, तेव्हा काही लुभ्य्रांनी मधी तोंड घातलं म्हणून टाकणं टाकल्यागत एक पत्र देऊन टाकलं. एरव्ही नाही का, एखाद्यानं येऊ नये असं वाटत असतं, त्याला ऐन वक्ताला आवतन द्यायचं म्हंजे तो यायला नको आणि आपल्यावर बोल नको, तसंच काहीसं. आता आपण टाकलेलं टाकणं हा गडी इतकं मनाला लावून घेईल याची काय कल्पना हो? तिकडं मंत्रालयातही असंच काहीसं झालं असणार. सांस्कृतिक कार्यक्रमांना हल्ली विनोद तावडे भसाभसा जात असतात, तेव्हां मुख्यमंत्र्यांनीही अधूनमधून गेलं पाहिजे, असा सल्ला कोणीतरी दिला असणार. त्यातून तात्यासाहेब ठाऊक नसले तरी उगाच त्यांचं नाव कुणी घेतलं की दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडायच्या. मागे मनोहरराव जोशी नाही, वीस वेळा येऊन गेल्यानंतर एकविसाव्या वेळी आल्यावर योगायोगानं तात्यांना भेटले, पण जाहीर भाषणात म्हणाले, नाशकात येऊन तात्यांचं दर्शन घेतल्याखेरीज नाशकातून पायच बाहेर निघत नाही! सांगायचा मुद्दा फडणवीसांना कुणीतरी भरीस घातलं. मुख्यमंत्री वा कोणीही तत्सम व्यक्ती पायी चालली तरी फटके खाणार आणि घोड्यावरून चालली तरी फटके खाणार. तात्यांच्या कार्यक्रमाला फडणवीस आले नाहीत? हेच का त्यांचे साहित्यप्रेम आणि हाच का त्यांना मराठीचा अभिमान? नकोच ते. नाशकात जाऊनच येऊ. यजमान मात्र कपाळाला हात लावून बसलेले. पाव्हण्याला कसं सांगावं, की बाबा, नको भलत्या फंदात पडू. त्यांचे हात कपाळाला असतानाच ज्यांची बैठक टिळक भवनात आणि उठबैस बारामतीत असते असे एक साहित्यप्रेमी राजकारणी (अस्तंगत होत चाललेली जमात नाही?) तिथे अवतरले. म्हणाले, अरे येड्यांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे रयतेचा राजा, तो स्वत:हून येतो म्हणतो आहे ना, मग नाट का लावता? ‘पण पत्रिका तर छापून आणि वाटूनही झाल्या’, एक कारभारी कळवळला. उठबैसवाल्याने सांगितले, नव्या छापा, नव्याने वाटा, नाही तर राहू द्या, लोकाना कळेलच की. पण आता नाट नको. इतके झाल्यावर बहुधा सारे रडतराऊ घोड्यावर स्वार झाले. कुसुमाग्रजांनी ‘राजा आला’ ही कविता प्रसवली, तेव्हां पंतप्रधान राजीव गांधी यांचा झालेला नाशिक दौरा त्यांच्या नजरेसमोर होता, असे म्हणतात. या कवितेचा एकूणच भाव (एकूण कडवी १७) तसा गोड नव्हे, तो कडवटच. पण कवितेच्या बाहेरील आणि विशेषत: पुरस्कार वितरण समारंभांच्या आयोजनामागील मुख्य प्रेरक तात्यासाहेब शिरवाडकर वेगळेच होते. प्रतिष्ठानचा असा प्रत्येक कार्यक्रम जुन्या जमान्यातील पाचअंकी संगीत नाटकांसारखा ऐसपैस तर असलाच पाहिजे़ पण तो चित्तचक्षुचमत्कारिकही असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. त्यापायीच की काय कोण जाणे, कार्यक्रमात एखादा व्हीव्हीआयपी असावा़ त्याच्या मागेपुढे कार्बाइनधारींचे कोंडाळे असावे, याची त्यांना आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाला भारदस्तपणा येतो, अशी काहीतरी त्यांची भावना असावी. मतलब, मुख्यमंत्री आपणहून येत आहेत म्हटल्यावर त्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक व्यवस्थेच्या चोखपणाची खातरजमा करून घेतली असती. पण आपली बाळं आपल्यासारखी कर्तबगार निघत नाहीत, हे साऱ्याच बापांच शल्य असतं, तेव्हां त्याला तात्यांचा तरी अपवाद का असावा?