शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:56 IST

जनतेला आमदार आणि सरकार निवडण्याचा आधिकार आहे. मुख्यमंत्री विजयी पक्षाकडून निवडण्यात येतो. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडून जनताच मुख्यमंत्री ठरवणार याचा उल्लेख का केला जातो, हे अद्याप स्पष्ट होत नाही.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर असून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच होणार असं शिवसेना नेते म्हणतात, तर भाजप नेत्यांनी, मुख्यमंत्री आमचाच असल्याचे शिवसेनेला ठणकावले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असलेले फडणवीस यांनी नवीन खेळी खेळली असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जनतेवर सोडल्याचे म्हटले.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच नाव आघाडीवर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपमधून कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, अशा वल्गना करण्यात येत आहे. आदित्य यांनी महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढून खेळपट्टी तयार कऱण्यास सुरुवातही केली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांना सोबतीला घेतले आहे. संजय राऊत देखील मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्या नावाचा पुनोरोच्चार करून भाजपवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात आपणच परत येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या वादात पडू नका, असा सूचक इशारा शिवसेना नेत्यांना दिला आहे. तसेच पुढचा मुख्यमंत्री जनताच ठरवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील हेच म्हणणे आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात त्यांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली नसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनताच ठरवेल असं त्यांनी म्हटले आहे.

वास्तविक पाहता, जनतेला आमदार आणि सरकार निवडण्याचा आधिकार आहे. मुख्यमंत्री विजयी पक्षाकडून निवडण्यात येतो. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडून जनताच मुख्यमंत्री ठरवणार याचा उल्लेख का केला जातो, हे अद्याप स्पष्ट होत नाही. कर्नाटकमध्ये जनतेने आमदार निवडून दिले. मुख्यमंत्री निवडताना राजकीय पक्षांना तडजोड करावी लागली. सत्ता स्थापनेपासून कर्नाटकमध्ये अस्थिरता आहे. यात जनतेची काहीही भूमिका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार जनतेला नसून बहुमत सिद्ध करणाऱ्या पक्षालाच असते, हे सिद्ध झालं.