शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

फडणवीसांची नवी खेळी; मुख्यमंत्रीपदाचा चेंडू हवेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:56 IST

जनतेला आमदार आणि सरकार निवडण्याचा आधिकार आहे. मुख्यमंत्री विजयी पक्षाकडून निवडण्यात येतो. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडून जनताच मुख्यमंत्री ठरवणार याचा उल्लेख का केला जातो, हे अद्याप स्पष्ट होत नाही.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर असून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच होणार असं शिवसेना नेते म्हणतात, तर भाजप नेत्यांनी, मुख्यमंत्री आमचाच असल्याचे शिवसेनेला ठणकावले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार असलेले फडणवीस यांनी नवीन खेळी खेळली असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जनतेवर सोडल्याचे म्हटले.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच नाव आघाडीवर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपमधून कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, अशा वल्गना करण्यात येत आहे. आदित्य यांनी महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढून खेळपट्टी तयार कऱण्यास सुरुवातही केली आहे. त्यात खासदार संजय राऊत यांना सोबतीला घेतले आहे. संजय राऊत देखील मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्या नावाचा पुनोरोच्चार करून भाजपवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात आपणच परत येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या वादात पडू नका, असा सूचक इशारा शिवसेना नेत्यांना दिला आहे. तसेच पुढचा मुख्यमंत्री जनताच ठरवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील हेच म्हणणे आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात त्यांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली नसून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनताच ठरवेल असं त्यांनी म्हटले आहे.

वास्तविक पाहता, जनतेला आमदार आणि सरकार निवडण्याचा आधिकार आहे. मुख्यमंत्री विजयी पक्षाकडून निवडण्यात येतो. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडून जनताच मुख्यमंत्री ठरवणार याचा उल्लेख का केला जातो, हे अद्याप स्पष्ट होत नाही. कर्नाटकमध्ये जनतेने आमदार निवडून दिले. मुख्यमंत्री निवडताना राजकीय पक्षांना तडजोड करावी लागली. सत्ता स्थापनेपासून कर्नाटकमध्ये अस्थिरता आहे. यात जनतेची काहीही भूमिका नाही. त्यामुळे मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार जनतेला नसून बहुमत सिद्ध करणाऱ्या पक्षालाच असते, हे सिद्ध झालं.