शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं नेतृत्व करावं; खा. उदयनराजे भोसले यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:41 IST

आम्ही तुमचे मित्रमंडळी आहोत. फक्त तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, राखीव ठेऊ नका म्हणजे झालं असंही उदयनराजेंनी म्हटलं.

कराड - देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करून मुख्यमंत्री बनावं अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यातील कराड इथं झालेल्या कृषी सोहळ्याच्या उद्धाटनात ते बोलत होते. यावेळी उदयनराजेंच्या फटकेबाजीने सगळ्यांमध्ये हशा पिकला. 

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मगाशी बैलगाडी बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कासरा पकडला तेव्हा मी सांगितले, ही सुरुवात आहे. यापुढच्या काळात तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यावा लागणार आहे. ही सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. मतदानाची टक्केवारी पाहिली तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपासह १४-१५ घटक पक्ष एकत्र आल्याने ४५ नव्हे तर ४८ खासदार महायुतीचे निवडून मोदींच्या पाठिशी उभे राहतील. आधीच्या सरकारमध्ये ज्या घोषणा झाल्या त्या कागदावरच होत्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्याचे धोरण अंमलात आणण्याचे काम मोदींनी केले आहे असं कौतुक उदयनराजेंनी केले. 

त्याचसोबत अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिएमबाबत काही सूचना केल्या. या सूचना लवकरात लवकर अंमलात याव्यात. त्यानंतर पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्या टीमचा कॅप्टन म्हणून तुम्ही इथं यावे आणि तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी. आम्ही तुमचे मित्रमंडळी आहोत. फक्त तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, राखीव ठेऊ नका म्हणजे झालं. कुणाला राखीव ठेवायचे आणि कुणाला नाही हे मी तुम्हाला सांगतो. मी हे बोललो त्यामुळे सगळेजण माझ्याकडे बारकाईने बघायला लागलेत. पण मी हे बोललो तरी इथं बसलेले सगळे तज्ज्ञ आहेत. ते मला राखीव म्हणून ठेवतील. त्यामुळे यांना टीममध्ये घ्या अशी फटकेबाजी उदयनराजेंनी केली. 

कृषी उद्योग आणि शेतकरी एकमेकांना पूरक 

गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्या पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. हा आमचाच बालेकिल्ला असे म्हटलं जाते. याठिकाणी दगडाला शेंदूरही फासले तरी तो निवडून येणारच असं बोलले जायचं. तेव्हा या लोकांच्या मनात एवढा अहंकार कशासाठी हा प्रश्न मला पडायचा. कृष्णाकाठचा भाग सोडला तर इतर भाग जो दुष्काळी परिसर आहे. या भागाला कुणी वरदान दिले असेल तर भाजपा लोकप्रतिनिधींनी संकल्पना मांडली आणि त्यातून आज या भागात हिरवळ पाहायला मिळते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जोपर्यंत शेतकरी प्रगतशील होणार नाही तोवर देश पुढे जाणार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपये देऊन हा भाग सिंचनाखाली आणला. ७० टक्के देशातील लोक शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी सदन होत नाही तोपर्यंत कृषी उद्योगालाही चालना मिळणार नाही. शेतकरी हा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे एकमेकांना पूरक असा हा व्यवसाय आहे असंही उदयनराजे यांनी सांगितले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले