शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 15:55 IST

Devendra Fadnavis On INDIA Alliance: इंडिया आघाडी अशी कुठलीच आघाडी नव्हती, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

Devendra Fadnavis On INDIA Alliance: विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. तर आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याचे ठरवले आहे. यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावरून भाजपाकडून आता इंडिआ आघाडीवर टीका केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने यात पुढाकार घेतला. उद्योगपती आनंद महिंद्रा हे मुंबई फेस्टिव्हलचे अध्यक्ष आहेत. मुंबईतील सर्व क्षेत्रातील लोक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत. स्टार्टअप चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणातील बदलांवर परिणाम करणारे दहा शाश्वत असे स्टार्टअप निवडण्यात आले होते. त्यातील तीन स्टार्टअपला पोरितोषिक देण्यात आले. जे स्टार्टअप सामान्य माणासच्या जीवनात बदल करणारे असतील तर त्यांच्याशी राज्य सरकारही समन्वय साधून पुढे जाण्याची भूमिका घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना इंडिया आघाडीतील फुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसला वाटा देणार नाहीत, पुढेही इंडिया आघाडी चालणार नाही

इंडिया आघाडी अशी कुठलीच आघाडी नव्हती. या आघाडीतील असून, प्रत्येक जण आपापल्या सुरात आम्ही गाऊ आणि एक समूहगीत तयार होईल, असे म्हणत असेल, तर तसे चालत नाही. समूहगीत हे कोरसमध्ये असते. एका दिशेने गावे लागते. एकच गीत गावे लागते. आम्ही एकत्र आहोत, हे भासवण्याचा जो काही प्रयत्न होता, तो आता उघडा पडला आहे. हे लोक एवढ्याचसाठी एकत्र राहू शकत नाही की, जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत, त्या पक्षांची त्या त्या ठिकाणी काँग्रेसची थेट स्पर्धा आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आपला वाटा देणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडी चालेल असे मला कधीही वाटले नाही, पुढेही ही आघाडी चालणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संधिसाधू आहेत, त्यांच्या दयेवर आम्ही निवडणूक लढवणार नाही. स्वबळावर निवडणुका कशा लढवायच्या हे काँग्रेसला माहीत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये काँग्रेसच्या दयेने ममता स्वत: पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या, अशी भूमिका चौधरी यांनी स्पष्ट केली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी