शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"असा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात, तो पंतप्रधान मोदींनी दाखवला!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 16:55 IST

टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय. 

नाशिकः देशात वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात केली. नवे कृषी कायदे का केले, याबाबतचं सत्य शेतकरी बांधवांना समजावून सांगण्यात आमचे प्रयत्न, तपश्चर्या कमी पडली. त्यामुळे मी देशाची मनापासून माफी मागतो, असं म्हणत, येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू, असं त्यांनी जाहीर केलं. 

पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर देशभरात वेगवेगळ्या स्तरांतून उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे अहंकारी मोदी सरकारला झुकावं लागलं, निवडणुकांवर डोळा ठेवून घेतलेला हा निर्णय आहे, एवढे बळी गेल्यानंतर ही उपरती झाली का?, अशा शब्दांत विरोधक मोदी सरकारचा समाचार घेत आहेत. मात्र, टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही, जे काही केलंय ते मोदींनी केलंय, असं निक्षून सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक केलंय. 

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला होता. काही लोक सातत्याने त्याला विरोध करत राहिले. काही लोकांना पटवून देऊ शकलो नाही म्हणून कायदा मागे घेत आहोत, असं पंतप्रधानांनी काल स्पष्टपणे सांगितलं आहे. लोकशाहीत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात तो मोदींनी दाखवला, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. मोदी सरकारनं सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून एकट्या महाराष्ट्रात ९ हजार कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यूपीए सरकारच्या काळात कृषी खात्यासाठी असलेलं ३५ हजार कोटींचं बजेट आज १ लाख ३५ हजार कोटीचं झालं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. टीका करणारे टीका करत असतात आणि काम करणारे काम करत राहतात, टीकाकारांना जनताच उत्तर देईल, अशी टिप्पणी त्यांनी केली.  

आडमुठी भूमिका जीवघेणी!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी आहे. देशभरात कुठेही घटना घडली, तर त्यावर प्रतिक्रिया द्यायला हे तयार असतात, पण राज्यात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सरकारची आडमुठी भूमिका जीवघेणी आहे. त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन आपली भूमिका लोकशाहीला अनुरूप केली पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, असंही फडणवीस यांनी सुनावलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmers Protestशेतकरी आंदोलन