शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:35 IST

Devendra Fadnavis Sharad Pawar, Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यावेळी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केलं होतं विधान

Devendra Fadnavis Sharad Pawar, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप भारतीय हिदूंना ठार केले. एकूण सात ते आठ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी चार दहशतवाद्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. यापैकी दोन दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारून तेथील हिंदूंना जाणीवपूर्वक ठार केले, असे हल्ल्यातून बचावलेल्या काही महिलांनी सांगितले. या साऱ्या घटनेनंतर घडलेल्या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी एक विधान केले. त्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले....

"इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथे जी लोकं होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे", असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रत्युत्तर

शरद पवारांच्या या विधानावर फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी सावध प्रत्युत्तर दिले. "शरद पवार काय म्हणाले हे मी ऐकलं नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वत: त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मला माहिती आहे. शरद पवारांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं," असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

"भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी जे लोक महाराष्ट्रात आहेत, त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. दिलेल्या वेळेत या सगळ्यांनी देश सोडून जायला हवे यादृष्टीने मॉनिटरींग केले जाईल. यात कुणी दिरंगाई केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक या महाराष्ट्रात राहणार नाहीत याची आम्ही योग्य काळजी घेऊ," असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला