शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

...ही तर लबाड सरकारची लबाडी : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:22 IST

केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे.

आमडीफाटा/धानला (नागपूर)- केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपाला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना केले.

निवडणुकांच्या काळामध्ये अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होते आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकीकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात 2001 ते 2017 पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना शेती खातं कुणाकडे जावे, यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरीप्रेम दिसून येते. केंद्रातील मोदीजींच्या सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे. शेतकरी सन्मान निधीसारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांना मोठा लाभ होत आहे. गेल्या काळात अनेक महत्त्वाची खाती ही विदर्भातील मंत्र्यांकडे होती. चंद्रशेखर बावनकुळे हे उर्जामंत्री असताना केवळ बिल भरले नाही, म्हणून एकाही शेतकर्‍याची वीज कापण्यात आली नाही. कायम शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने काम केले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस