शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

विकास, पारदर्शकतेचा बाँड

By admin | Updated: February 8, 2017 05:26 IST

मुंबई महापालिका क्षेत्रात उपलोकायुक्त नेमणार, निविदांसाठी संगनमत, निकृष्ट कामे करणे, ई-टेंडरला विरोध करणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हे दाखल

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात उपलोकायुक्त नेमणार, निविदांसाठी संगनमत, निकृष्ट कामे करणे, ई-टेंडरला विरोध करणाऱ्यांविरुद्ध संघटित गुन्हे दाखल करण्याबरोबच संपूर्ण पारदर्शक कारभाराची हमी देणारा, तसेच विकासाचा बाँड आज जाहीरनामा म्हणून भाजपाने मुंबईकरांसमोर ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदींच्या उपस्थितीत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज पत्र परिषदेत हा जाहीरनामा मांडला. त्यानुसार, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, कंत्राटदार व त्यांच्या परिवाराची वार्षिक बॅलन्सशीट दरवर्षी जाहीर केली जाणार आहे. मुंबईकरांना येत्या पाच वर्षांत २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. पाच वर्षांपर्यंत ७५० लीटर प्रतिदिन प्रति कुटुंब पाण्याचे दर स्थिर ठेवणार, त्यापुढील वापरासाठी पाणीपट्टीमध्ये दरवर्षी ८ टक्के वाढ, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे पाणीप्रकल्प पूर्ण करणार, पाच वर्षांत खड्डेमुक्त मुंबई, उन्नत रेल्वेमार्गालगत २५० किमीचे उन्नत रस्त्यांचे जाळे उभारणार आणि मुंबईकरांना टोलमुक्ती अशी आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकांच्या जागांचा पब्लिक, प्रायव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) मॉडेलअंतर्गत खासगी इस्पितळे आदींच्या उभारणीसाठी वापर करून २० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करण्यात आले. त्यांची चौकशी भाजपाची महापालिकेत सत्ता येताच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाईल, असे आ.आशिष शेलार यांनी सांगितले.

तिन्ही स्मारके पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.