शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास- अजित पवार

By admin | Updated: October 25, 2016 22:01 IST

सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 25 - आधी पिंपरी-चिंचवड ही कष्टक-यांची नगरी होती. नगरपालिकेनंतर ही नगरी महापालिका झाली. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उड्डाण पूल, स्वच्छता, शिक्षण आदी अनेक प्रश्न मार्गी लागले. सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी असल्याचा शब्द माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.  
सोलापूर मध्य आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी सायंकाळी बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनात घेण्यात आला. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, माजी आमदार युन्नूसभाई शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, नगरसेवक दिलीप कोल्हे, संतोष पवार, शंकर पाटील, कय्युम बुºहाण, विद्या लोलगे, अरुणा वर्मा यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मंडळी नेहमीच पवारसाहेबांवर विश्वास व्यक्त केला आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, १९९१ साली पिंपरी-चिंचवडकरांनी मला आमदार केले. मी या शहराच्या विकासाकडे जातीने लक्ष घातले. पुढच्या १० वर्षांमध्ये या शहराचा चेहरामोहरा बदलला. शहरातील गरिबांसाठी घरकूल योजना राबवली. ज्या काही मूलभूत गरज होत्या, त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आज प्रगत अन्  विकासाचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचे नाव आशिया खंडात झाले. सोलापुरातही अनेक प्रश्न आहेत. विडी कामगारांचे प्रश्न असतील, ड्रेनेज, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न असतील, ते सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांनी राष्ट्रवादीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. मनपात राष्ट्रवादीची सत्ता आली तर मागील पाच वर्षांमध्ये जेवढा विकास झाला त्याहून अधिक पटीने शहराचा विकास करुन दाखवेन.
शहर आणि ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारसाहेबांना मनापासून साथ दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवारसाहेबांनी प्रतिनिधीत्व केले आहे. विकासकामांचा निधी वाटप होत असताना सोलापूर जिल्ह्याला झुकते माफ देत चला, अशा सूचनाच पवारसाहेबांच्या असायच्या. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल आणि स्व. आर. आर. पाटील हे पालकमंत्री असताना जिल्ह्याला निधी मिळत रहायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज सोलापुरात अनेक प्रश्न आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद, मनभेद विसरुन कामाला लागावे. कुणाबद्दल गैरसमज ठेवू नका. ठेवलात तर विनाकारण अडचणी निर्माण होतील. ग्रामीण भागातील नगरपालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या पक्षाच्या उमेदवारांना शहरातील कार्यकर्त्यांनी मनापासून मदत करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. 
महापौर, आयुक्त करतात तरी काय ?
शहरातील विविध प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष बैठक बोलावणार होतो. त्यासाठी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांना महापौरांचे एक पत्र द्या म्हणालो. डोंगरे यांचे पत्र आले. पण आजतागायत महापौरांनी पत्र दिले नाही. मनपा परिवहन खात्यातील ८७ बसच्या चेसी क्रॅक झाल्या. त्याबद्दल अशोक लेलॅन्ड कंपनीला मनपा आयुक्त साधा जाब विचारत नाहीत. महापौर, मनपा आयुक्त करतात तरी काय ? असा सवालही अजित पवार यांनी केला. 
चुकीच्या माणसाला प्रवेश देऊ नका-
राष्ट्रवादी पार्टी वाढवत असताना चुकीचा माणसाला पक्षात प्रवेश देऊ नका. जर चुकीचा माणूस पक्षात आला तर इतरांनी मला फोन करून तक्रार करावी, असे सांगताना अजित पवार यांनी स्वत:चा मोबाईल नंबरही सांगून टाकला. तुम्ही तक्रार केली तर मी लागलीच त्यात लक्ष घालेन. मी मनकवडा नाही. मला खरे बोललेले आवडते. दोन्ही बाजू पाहून तडकाफडकी निर्णय घ्यायला मी मागे-पुढे पाहणारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
अजित पवार म्हणाले....
राष्ट्रवादीत पक्षात सन्मानाने पदे दिली जातात. इथे पदे विकली जात नाही.
एखादे काम का होत नाही. केल्याशिवाय होत नाही. माझ्याबरोबर फिरा, तुम्हाला अनुभव येईल.
मोदींच्या लाटेत नगरसेवक म्हणून कधीच निवडून न येणारे खासदार झाले. 
राज्यातील सरकारने पाण्याचे नियोजन केले असते तर शेतकºयांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले नसते. 
मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.