शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

लातूरमध्ये विकास हाच प्रमुख मुद्दा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:34 IST

चुरशीची लढाई । तिसरी आघाडी कुणाची मते खाणार? अल्पसंख्याक कुणाच्या बाजूने?

प्रदीर्घ काळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या लातूर मतदारसंघातून भाजपची यापूर्वी दोनवेळा सरशी झाली. आता पुन्हा एकदा भाजप आव्हान देऊन जागा टिकविणार की, काँग्रेस पुन्हा विजय खेचून आणणार हे निकालानंतरच कळेल. परंतु, सद्य:स्थितीत भाजपने प्रचारात आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून माहोल बनविला आहे. त्याला काँग्रेस प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कसे तोंड देणार, हा प्रश्न आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळवून दिली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यानंतर झालेला वादही अंगावर घेतला. विरोधकांनीही टीकेची झोड उठविली. ज्या खासदाराने उत्तम काम केले, त्यांना तिकीट का मिळाले नाही, असा सवाल माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांनी उपस्थित केला. थेट उमेदवारीचे राजकारण आणि अर्थकारण चर्चिले गेले. परंतु, स्थानिक मुद्दे आणि आरोपांना न जुमानता निलंगेकर यांनी लोकसभेची निवडणूक देशहितासाठी असल्याचे सांगत प्रचार यंत्रणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवतीच उभी केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे हे भाजपच्या प्रचाराचे एकमेव सूत्र आहे.

आता प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असून, भाजपने मोदी यांच्या सभेनंतर बनलेला माहोल टिकविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी काँग्रेसने वारंवार स्थानिक मुद्द्यांना हात घालत भाजपच्या उमेदवारीचा वाद तेवत ठेवला आहे. मनपा, जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्ता मिळूनही त्यांनी काय केले, केंद्र आणि राज्यातील सत्तेचाही लातूरला कोणता लाभ मिळाला, हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याला उत्तर देताना भाजपने रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना, जलयुक्त शिवारची कामे सांगायला सुरुवात केली आहे.मोदींनी जाहीर सभेमध्ये पुलवामातील शहिदांच्या नावावर मते मागितल्याचा विषय काँग्रेसने उचलून धरला आहे. पंतप्रधान बेरोजगारीवर बोलत नाहीत. जीएसटी, नोटबंदीवरही आता का बोलत नाहीत, हा काँग्रेसचा सवाल आहे.

दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदपूर आणि निलंगा येथे सभा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांना चर्चेत ठेवले आहे. आता मतांचे विभाजन कसे आणि किती होणार? याकडे लक्ष लागले आहे. एकंदर, भाजप, काँग्रेसमधील रस्सीखेच प्रचाराच्या अखेरीस अटीतटीची होणार आहे.मच्छिंद्र कामंतलातूर शहर, लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा प्रभावआहे. तर कामंत यापूर्वी उदगीर विधानसभा मतदारसंघातून लढले असून, तिथे आघाडीने तुल्यबळ ताकद निर्माण केली आहे. अहमदपुरातही राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले आहे. मात्र लोहा मतदारसंघातील चित्र अस्पष्ट आहे. मतदानापर्यंत येथील लढत रंगतदार होईल.

सुधाकर शृंगारेपालकमंत्र्यांचा निलंगा मतदारसंघ तसेच अहमदपूर आणि उदगीरमध्ये भाजप आमदार ही शृंगारेंची जमेची बाजू आहे. मनपा, जि.प.त भाजपची सत्ता आहे. तर लोहा मतदारसंघाने भाजपला यापूर्वी मोठे मताधिक्य दिले होते. मात्र शहर आणि ग्रामीण मतदारसंघात भाजपला काँग्रेसशी टक्कर द्यावी लागेल.कळीचे मुद्देभाजपचा प्रचार राष्ट्रहित, देशहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती फिरत आहे.काँग्रेसने बेरोजगारी, दुष्काळ, कर्जमाफी, पीकविमा आणि भाजप उमेदवारी वादावर प्रचारचक्र सुरू ठेवले आहे.

 

टॅग्स :latur-pcलातूर