शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

लातूरमध्ये विकास हाच प्रमुख मुद्दा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:34 IST

चुरशीची लढाई । तिसरी आघाडी कुणाची मते खाणार? अल्पसंख्याक कुणाच्या बाजूने?

प्रदीर्घ काळ केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या लातूर मतदारसंघातून भाजपची यापूर्वी दोनवेळा सरशी झाली. आता पुन्हा एकदा भाजप आव्हान देऊन जागा टिकविणार की, काँग्रेस पुन्हा विजय खेचून आणणार हे निकालानंतरच कळेल. परंतु, सद्य:स्थितीत भाजपने प्रचारात आघाडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून माहोल बनविला आहे. त्याला काँग्रेस प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कसे तोंड देणार, हा प्रश्न आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळवून दिली. विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यानंतर झालेला वादही अंगावर घेतला. विरोधकांनीही टीकेची झोड उठविली. ज्या खासदाराने उत्तम काम केले, त्यांना तिकीट का मिळाले नाही, असा सवाल माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांनी उपस्थित केला. थेट उमेदवारीचे राजकारण आणि अर्थकारण चर्चिले गेले. परंतु, स्थानिक मुद्दे आणि आरोपांना न जुमानता निलंगेकर यांनी लोकसभेची निवडणूक देशहितासाठी असल्याचे सांगत प्रचार यंत्रणा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवतीच उभी केली आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे हे भाजपच्या प्रचाराचे एकमेव सूत्र आहे.

आता प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असून, भाजपने मोदी यांच्या सभेनंतर बनलेला माहोल टिकविण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी काँग्रेसने वारंवार स्थानिक मुद्द्यांना हात घालत भाजपच्या उमेदवारीचा वाद तेवत ठेवला आहे. मनपा, जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्ता मिळूनही त्यांनी काय केले, केंद्र आणि राज्यातील सत्तेचाही लातूरला कोणता लाभ मिळाला, हा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याला उत्तर देताना भाजपने रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना, जलयुक्त शिवारची कामे सांगायला सुरुवात केली आहे.मोदींनी जाहीर सभेमध्ये पुलवामातील शहिदांच्या नावावर मते मागितल्याचा विषय काँग्रेसने उचलून धरला आहे. पंतप्रधान बेरोजगारीवर बोलत नाहीत. जीएसटी, नोटबंदीवरही आता का बोलत नाहीत, हा काँग्रेसचा सवाल आहे.

दरम्यान, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अहमदपूर आणि निलंगा येथे सभा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या राम गारकर यांना चर्चेत ठेवले आहे. आता मतांचे विभाजन कसे आणि किती होणार? याकडे लक्ष लागले आहे. एकंदर, भाजप, काँग्रेसमधील रस्सीखेच प्रचाराच्या अखेरीस अटीतटीची होणार आहे.मच्छिंद्र कामंतलातूर शहर, लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा प्रभावआहे. तर कामंत यापूर्वी उदगीर विधानसभा मतदारसंघातून लढले असून, तिथे आघाडीने तुल्यबळ ताकद निर्माण केली आहे. अहमदपुरातही राष्ट्रवादीने भाजपला आव्हान दिले आहे. मात्र लोहा मतदारसंघातील चित्र अस्पष्ट आहे. मतदानापर्यंत येथील लढत रंगतदार होईल.

सुधाकर शृंगारेपालकमंत्र्यांचा निलंगा मतदारसंघ तसेच अहमदपूर आणि उदगीरमध्ये भाजप आमदार ही शृंगारेंची जमेची बाजू आहे. मनपा, जि.प.त भाजपची सत्ता आहे. तर लोहा मतदारसंघाने भाजपला यापूर्वी मोठे मताधिक्य दिले होते. मात्र शहर आणि ग्रामीण मतदारसंघात भाजपला काँग्रेसशी टक्कर द्यावी लागेल.कळीचे मुद्देभाजपचा प्रचार राष्ट्रहित, देशहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती फिरत आहे.काँग्रेसने बेरोजगारी, दुष्काळ, कर्जमाफी, पीकविमा आणि भाजप उमेदवारी वादावर प्रचारचक्र सुरू ठेवले आहे.

 

टॅग्स :latur-pcलातूर