शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

By admin | Updated: November 8, 2016 02:06 IST

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

सुरेश काटे , तलासरीमहाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन ही दिले. निसर्गरम्य दापचरीतील पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने आपण त्याचा विकास करू , अशी ग्वाही देखील दिली.जिल्ह्यातील दापचरी येथे दुग्धविकास प्रकल्पाच्या हजारो एकर पडिक असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली . १९६३ साली दापचरी येथे आदिवासींची २६०० हेक्टर जमीन हस्तांतरित करुन घेऊन मुंबई ठाण्याला मुबलक आणि चांगले दूध मिळावे म्हणून करोडो रूपये खर्च करुन डेअरीचा प्रकल्प उभारला. मात्र काही वर्षात त्याला उतरती कळा लागली. त्यानंतर ही शासकीय सहा ते सात हजार एकर जागा तसेच उभारण्यात आलेला दुग्धविकास प्रकल्प आणि त्यासाठी लागणारी महागडी सामग्री धूळखात पडली आहे. या संदर्भात आज त्यांनी ही पाहणी केली. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकल्प पुन्हा उभा कसा करता येईल यादृष्टीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुग्धविकास प्रकल्पात कोणाचे अतिक्रमण असल्यास ते कितीही बडे नेते असले तरी ते उठवले जाईल अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जागा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून मी तिचा विकास करणार, राज्याचे उत्पन्न वाढविणार असे ते म्हणाले. दापचरी प्रकल्पातील कृषिक्षेत्राचे सन १९७४-७५ मध्ये करारनामे करून घेऊन भाडेपट्टीवर भूखंडांचे वाटप करण्यात आले. शेतीसाठी बारमाही पाण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांनी आपल्या नोकऱ्या, कामधंदे, शेतीवाडी सोडून कृषिक्षेत्र योजनेत भाग घेतला. कृषिक्षेत्र ताब्यात घेण्यापूर्वी जाचक असा करारनामा करून एक हेक्टर क्षेत्र, दोन खणी घर (सुमारे १८० चौ, फूट) बारागायी साठी गोठा इतके क्षेत्र प्रत्येकाला वाटप करण्यात आले. मात्र वाटप केलेले क्षेत्र पूर्णपणे विकसित नव्हते. तसेच शेतीसाठी पाण्याची सोय नसतांना देखील दापचरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून १२ संकरित गायी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी सुमारे ३६ हजार इतके कर्ज मंजूर केले. बंगलोर येथून गायी खरेदी करून देण्यात आल्या. दुधाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चांलविणाऱ्यांची फसवणूक केली गेली. शेतीला वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही व गायींना दापचरीचे हवामानही मानवले नसल्याने अपेक्षित दुध उत्पादन मिळाले नाही. पशुवैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या विम्याची भरपाईसुद्धा झाली नाही. सन अशा विविध मागण्या यावेळी त्यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कृषिक्षेत्र धारकांनी १९७४ ते १९७८ या कालावधीत २० लाख ८५ हजार लिटर इतक्या दुधाचा पुरवठा शासनाला केला आहे. हे पाहता समस्या दूर झाल्या तर येथील दुग्धव्यावसायिक चांगली प्रगती करू शकतील, हे सिद्ध झाले आहे. असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.