शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

दापचरीत पर्यटनाचा विकास करणार - महादेव जानकर

By admin | Updated: November 8, 2016 02:06 IST

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

सुरेश काटे , तलासरीमहाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दापचरी येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन ही दिले. निसर्गरम्य दापचरीतील पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने आपण त्याचा विकास करू , अशी ग्वाही देखील दिली.जिल्ह्यातील दापचरी येथे दुग्धविकास प्रकल्पाच्या हजारो एकर पडिक असलेल्या जागेची त्यांनी पाहणी केली . १९६३ साली दापचरी येथे आदिवासींची २६०० हेक्टर जमीन हस्तांतरित करुन घेऊन मुंबई ठाण्याला मुबलक आणि चांगले दूध मिळावे म्हणून करोडो रूपये खर्च करुन डेअरीचा प्रकल्प उभारला. मात्र काही वर्षात त्याला उतरती कळा लागली. त्यानंतर ही शासकीय सहा ते सात हजार एकर जागा तसेच उभारण्यात आलेला दुग्धविकास प्रकल्प आणि त्यासाठी लागणारी महागडी सामग्री धूळखात पडली आहे. या संदर्भात आज त्यांनी ही पाहणी केली. प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रकल्प पुन्हा उभा कसा करता येईल यादृष्टीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या दुग्धविकास प्रकल्पात कोणाचे अतिक्रमण असल्यास ते कितीही बडे नेते असले तरी ते उठवले जाईल अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जागा म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असून मी तिचा विकास करणार, राज्याचे उत्पन्न वाढविणार असे ते म्हणाले. दापचरी प्रकल्पातील कृषिक्षेत्राचे सन १९७४-७५ मध्ये करारनामे करून घेऊन भाडेपट्टीवर भूखंडांचे वाटप करण्यात आले. शेतीसाठी बारमाही पाण्याचे आमिष दाखविल्याने अनेकांनी आपल्या नोकऱ्या, कामधंदे, शेतीवाडी सोडून कृषिक्षेत्र योजनेत भाग घेतला. कृषिक्षेत्र ताब्यात घेण्यापूर्वी जाचक असा करारनामा करून एक हेक्टर क्षेत्र, दोन खणी घर (सुमारे १८० चौ, फूट) बारागायी साठी गोठा इतके क्षेत्र प्रत्येकाला वाटप करण्यात आले. मात्र वाटप केलेले क्षेत्र पूर्णपणे विकसित नव्हते. तसेच शेतीसाठी पाण्याची सोय नसतांना देखील दापचरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून १२ संकरित गायी खरेदी करण्यासाठी प्रत्येकी सुमारे ३६ हजार इतके कर्ज मंजूर केले. बंगलोर येथून गायी खरेदी करून देण्यात आल्या. दुधाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चांलविणाऱ्यांची फसवणूक केली गेली. शेतीला वेळेत पाणी उपलब्ध झाले नाही व गायींना दापचरीचे हवामानही मानवले नसल्याने अपेक्षित दुध उत्पादन मिळाले नाही. पशुवैद्यकीय सुविधा न मिळाल्याने अनेक गाई मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या विम्याची भरपाईसुद्धा झाली नाही. सन अशा विविध मागण्या यावेळी त्यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कृषिक्षेत्र धारकांनी १९७४ ते १९७८ या कालावधीत २० लाख ८५ हजार लिटर इतक्या दुधाचा पुरवठा शासनाला केला आहे. हे पाहता समस्या दूर झाल्या तर येथील दुग्धव्यावसायिक चांगली प्रगती करू शकतील, हे सिद्ध झाले आहे. असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.