शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

शेतकरी हिताचे धोरण राबवा

By admin | Updated: October 30, 2015 01:05 IST

राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली

मुंबई : राज्यात दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या हिताचे धोरण आखण्याची सूचना राज्य सरकारला केली. त्याचप्रमाणे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुुटुंबीयांची परिस्थिती काय आहे, अशी विचारणा करीत, त्याबाबतची संपूर्ण माहिती देण्याची सूचना न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केली.यावर्षी मराठवाड्यात ६०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने, उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत, ‘सू-मोटो’ दाखल करून घेतले. ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती केली. गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड. कुंभकोणी यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यात १५,९७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सादर केली आहे. ‘आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन-चार एकर जमीन आहे. मात्र, या अल्पभूधारकांना काहीच उत्पन्न मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे समाजाला तोंड कसे दाखवायचे, या भीतीने ते आत्महत्या करत आहेत. ज्यांच्या मालकीची शेती नाही आणि जे शेतमजूर आहेत, अशी लोक आत्महत्या करत नाहीत. केवळ समाजाच्या भीतीने काही शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशा अनेक बाबी संशोधनातून पुढे आल्या आहेत,’ असे त्यांनी माहितीत नमूद केले आहे. त्यावर खंडपीठाने एकत्रित शेती पद्धत राबवण्याची सूचना राज्य सरकारला केली. एकत्रित शेती पद्धत करण्यासाठी एपीएमसी कायद्यात सुधारणा करावी लागली तर करा, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)