शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचं वास्तव्य लाभलेल्या स्थळांचा विकास जलदगतीने करा : जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 19:16 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश

मुंबई, दि. 11 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत अशा पाच स्थळांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचतीर्थ म्हणून घोषित केले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू, लंडन येथील निवासस्थान, नागपूर येथील दीक्षाभूमी, नवी दिल्ली येथील महापरिनिर्वाण स्थळ, मुंबई येथील चैत्यभूमी या स्थळांचा समावेश आहे. यातील दोन स्थळे महाराष्ट्रातील असून या व्यतीरिक्त सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या स्थळांचा गतिमान विकास करण्यात यावा,  असे निर्देश रावल यांनी दिले. घोषित स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकत्रित बैठक पार पडली, त्‍यावेळी ते बोलत होते.या स्थळांच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यवाही गतिमानतेने राबविण्यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.लेण्यांच्या विकासासाठी तज्ज्ञांची बैठक-राज्यभरातील लेण्यांचा विकास करून पर्यटकांची संख्या वाढविण्यासंदर्भात राज्यभरातील लेणी तज्ञांची लवकरच बैठक बोलविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर विकास कामे तातडीने राबविण्यात येतील अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. लेण्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले.मंत्रालयात आयोजित बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार गौतम चाबुकस्वार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.