शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

बाबासाहेबांचं वास्तव्य लाभलेल्या स्थळांचा विकास जलदगतीने करा : जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 19:16 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश

मुंबई, दि. 11 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित स्थळांना पर्यटनस्थळांचा दर्जा देणे व या स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाही गतिमान पद्धतीने राबवावी, असे निर्देश पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांचे वास्तव्य लाभलेल्या किंवा त्यांच्याशी निगडीत अशा पाच स्थळांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचतीर्थ म्हणून घोषित केले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव महू, लंडन येथील निवासस्थान, नागपूर येथील दीक्षाभूमी, नवी दिल्ली येथील महापरिनिर्वाण स्थळ, मुंबई येथील चैत्यभूमी या स्थळांचा समावेश आहे. यातील दोन स्थळे महाराष्ट्रातील असून या व्यतीरिक्त सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या स्थळांचा गतिमान विकास करण्यात यावा,  असे निर्देश रावल यांनी दिले. घोषित स्थळांचा विकास करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग, पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एकत्रित बैठक पार पडली, त्‍यावेळी ते बोलत होते.या स्थळांच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यवाही गतिमानतेने राबविण्यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.लेण्यांच्या विकासासाठी तज्ज्ञांची बैठक-राज्यभरातील लेण्यांचा विकास करून पर्यटकांची संख्या वाढविण्यासंदर्भात राज्यभरातील लेणी तज्ञांची लवकरच बैठक बोलविण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर विकास कामे तातडीने राबविण्यात येतील अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. लेण्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासंदर्भात मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले.मंत्रालयात आयोजित बैठकीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार गौतम चाबुकस्वार, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.