शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटर उभारणार नाही - गृहमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:26 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डिटेन्शन सेंटरही उभारू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिली. काही मंडळी मुस्लिम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका, असे सांगतात. मात्र, जोपर्यंत तुम्ही जवळ येणार नाहीत, तोपर्यंत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समजणार कसे, असेही त्यांनी यावेळी सांगत, मुस्लिम बांधवांना आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि यापुढेही असणार, असे स्पष्ट केले.नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठाण्यातील मुस्लिम बांधव येत्या काही दिवसांत मोर्चा काढणार आहेत. परंतु, या मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिंदे यांच्या मध्यस्थीने शनिवारी ठाण्यात रात्री एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिंदे यांनी कोणालाही घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगितले. या राज्यात कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला भय वाटणार नाही, असे निर्णय घेण्यासाठी हे सरकार बनले आहे. त्यामुळे ज्या दिवशी नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांच्याकडून मुस्लिम समाजाला उचकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही अशा अफवांवर विश्वास न ठेवता शांततेच्या मार्गाने आपली मते व्यक्त करावीत, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी