शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

न्यायालयाची देखरेख असूनही बांधकाम मजूर उपेक्षितच : आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 20:05 IST

राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पुण्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी सुमारे ५० लाखापेक्षा अधिक लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत.

पुणे - राज्याच्या व देशाच्या विविध भागातून पुण्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी सुमारे ५० लाखापेक्षा अधिक लोक बांधकाम कामगार म्हणून काम करीत आहेत. मात्र त्यातील मोठ्या प्रमाणात काम करणारे लोकांची अधिकृत नोंदणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना कोणतीही विपरीत दुर्घटना घडल्यास विमा संरक्षण अथवा कुटुंबीयांना देय असलेले आर्थिक लाभ मिळणे दुरापास्त होते. हा विषय सध्या न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याचे राज्य सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप न्यायालयाकडून याबाबत मार्गदर्शक तत्वे प्राप्त झालेली नाहीत. परिणामी बांधकाम मजुरांची ख-या अर्थाने उपेक्षाच होते आहे, अशी खंत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केली.सिंहगड रस्त्यावर मंगळवारी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी बांधकाम सुरू असलेल्या सेया या इमारतीचे काम सुरू असताना त्याचा  काही भाग कोसळून दहाव्या मजल्यावरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी आज आ. डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून सदर केसच्या तपासाबाबत व जखमी लोकांच्या उपचाराची चौकशी करून माहिती घेतली. जखमी मजूर जखमी झाल्याप्रकरणी १६४ अन्वये गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली.त्या पुढे म्हणाल्या, बांधकाम व्यवसाय हा सध्या अनेक प्रकारच्या संकटांना समोर जात आहे. असे असतानाही मा. न्यायालय आणि सरकारच्या माध्यमातून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने या विषयाचा विधीमंडळात पाठपुरावा केला आहे. बांधकामे करीत असताना एका बाजूला मजूर उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे उपलब्ध बांधकाम मजुरांची कोणतीही अधिकृत नोंदणी करण्याची तसदी बांधकाम व्यावसायिक अथवा ठेकेदार घेत नाहीत. या ठिकाणीही मृत झालेल्या कामगारांची कोणतीही नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या खात्यामध्ये बांधकाम उपकरातून तब्बल ४७०० कोटी रक्कम सरकारकडे जमा झाली आहे. या रकमेचे दरमहा व्याज काही कोटींमध्ये सरकारकडे प्राप्त होते. मात्र असे असूनही केवळ २०० कोटी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम कामगार अथवा इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत.  अनेकदा शहरांमध्ये बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामगारांसाठी सुरक्षिततेची कसलीही सुविधा, तातडीची मदत मिळण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसते. दुर्घटना घडल्यानंतर जरी कोर्टामार्फत दोषींना शिक्षा होत असली तरी जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मात्र फारच तुटपुंजी मिळते. या पार्श्वभूमीवर आ. डॉ. गोऱ्हे यांनी मा. मुख्यमंत्री व कामगारमंत्री यांना दिलेल्या निवेदनात या दुर्घटनेतील पिडीतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, ठेकेदार व बिल्डर यांच्यातील करार उपलब्ध व्हावेत आणि कामगारांची नोंदणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध करून याबाबतीतली माहिती मिळावी अशा मागण्या केल्या आहेत.अनेकदा अशा दुर्घटना घडल्यावर जखमी मजुरांना लवकरात लवकर त्यांच्या मूळ गावी परत पाठविले जाते. त्यांच्या कुटुंबीयांना किरकोळ रक्कम देऊन त्यांची बोळवण केली गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.  मात्र या घटनेमध्ये पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाडी पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी पुणे व झारखंडमधील कामगार आयुक्तांशी संपर्क करून या मृत व जखमीच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत करून देण्याच्या उद्देशाने संपर्क साधला आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी विभागप्रमुख नितीन वाघ, संतोष गोपाळ, मनीष जगदाळे, निलेश गिरमे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना