शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
6
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
7
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
8
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
9
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
10
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
11
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
12
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
13
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
14
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
15
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
16
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
17
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
18
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
19
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

दलित वस्त्यांवर खर्च करूनही समस्या कायम

By admin | Updated: June 16, 2014 03:55 IST

गेल्या चार वर्षात कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांवर शासनाने तब्बल १.४४ कोटी विकासावर खर्च केले असून याच दलित वस्त्यामध्ये या काळात लाखोंची विकासकामे झाली

शिवा ठाकूर, खडवलीगेल्या चार वर्षात कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांवर शासनाने तब्बल १.४४ कोटी विकासावर खर्च केले असून याच दलित वस्त्यामध्ये या काळात लाखोंची विकासकामे झाली असताना आजही येथे समस्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेला निधी याच तालुक्याकरिता अपुरा पडला की काय, असा सवाल आज येथे होत आहे.दि. ५ डिसेंबर २०११ रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व दलित वस्त्यांमधील अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील जनतेच्या गरजा भागवण्याकरिता प्रत्येक दलित वस्तीला सन १९९९ पासून पाच लाखांचा विकास अनुदान निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दि. १ डिसेंबर २०११ रोजी लोकसंख्येच्या निकषावर या अनुदानात वाढ करण्यात आली. शासनाने सर्व दलित वस्त्यांचा विकास डोळ्यांसमोर ठेवून मोठा निधी कल्याण तालुक्यात दिला. जोडरस्ते, गटारे, पथदिवे, विहीर, शौचालय, तसेच वीजपुरवठा अशा कामांना शासनाने मंजुरी देऊन सन २०११ पासून याच कल्याण तालुक्यात आतापर्यंत १.४४ कोटींचा निधी खर्ची घातला. एकूण ५६ दलित वस्त्या असलेल्या कल्याण तालुक्यातील याच दलित वस्त्यांची लोकसंख्या ७ हजार ४०९ इतकी आहे. या सर्व जनतेचा विकास व्हावा म्हणून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एकूण ४३ ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्त्यांचा विकास झाल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे़ पण आजही कित्येक दलित वस्त्यांमध्ये पाण्याची, पथदिवे, विजेची समस्या पाहायला मिळते. कुठे रस्त्याची, कुठे पाण्याची समस्या दिसते. चार वर्षांपूवी तयार केलेले रस्ते उखडून गेल्याने या वस्त्यांमध्ये मुख्य रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने खर्ची घातलेला निधी हा केवळ कागदोपत्री तर खर्चिला गेला नाही ना, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.सन २०११ ते २०१२ या वर्षात शासनाने कल्याण तालुक्याकरिता ५९. ८४ लाखांचा निधी दिला. सन २०१२ ते २०१३ मध्ये याच तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासाकरिता ३.६० लाखांचा निधी देण्यात आला. यातून एकूण ४३ ग्रामपंचायत हद्दीतील ५६ दलित वस्त्यांमध्ये विकासकामे झाल्याची माहिती कल्याण पंचायत समिती सूत्रांनी दिली. सन २०१३ ते सन २०१४ मध्ये याच तालुक्याकरिता शासनाने ४९ लाखांचा निधी दिला. त्यामुळे शासन कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासावर भर देत आहे. त्याकरिता मोठा निधी देत असल्याचे दिसून येते, मात्र याच निधीचा वापर अन्य ठिकाणी केला जात आहे, तसेच सर्वसाधारण वस्त्याही दलित वस्ती म्हणून दाखविण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे़ याकडे जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर दलितांचा हा निधी परस्पर इतर ठिकाणी वापरला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.