शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्त्यांवर खर्च करूनही समस्या कायम

By admin | Updated: June 16, 2014 03:55 IST

गेल्या चार वर्षात कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांवर शासनाने तब्बल १.४४ कोटी विकासावर खर्च केले असून याच दलित वस्त्यामध्ये या काळात लाखोंची विकासकामे झाली

शिवा ठाकूर, खडवलीगेल्या चार वर्षात कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांवर शासनाने तब्बल १.४४ कोटी विकासावर खर्च केले असून याच दलित वस्त्यामध्ये या काळात लाखोंची विकासकामे झाली असताना आजही येथे समस्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेला निधी याच तालुक्याकरिता अपुरा पडला की काय, असा सवाल आज येथे होत आहे.दि. ५ डिसेंबर २०११ रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व दलित वस्त्यांमधील अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील जनतेच्या गरजा भागवण्याकरिता प्रत्येक दलित वस्तीला सन १९९९ पासून पाच लाखांचा विकास अनुदान निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात दि. १ डिसेंबर २०११ रोजी लोकसंख्येच्या निकषावर या अनुदानात वाढ करण्यात आली. शासनाने सर्व दलित वस्त्यांचा विकास डोळ्यांसमोर ठेवून मोठा निधी कल्याण तालुक्यात दिला. जोडरस्ते, गटारे, पथदिवे, विहीर, शौचालय, तसेच वीजपुरवठा अशा कामांना शासनाने मंजुरी देऊन सन २०११ पासून याच कल्याण तालुक्यात आतापर्यंत १.४४ कोटींचा निधी खर्ची घातला. एकूण ५६ दलित वस्त्या असलेल्या कल्याण तालुक्यातील याच दलित वस्त्यांची लोकसंख्या ७ हजार ४०९ इतकी आहे. या सर्व जनतेचा विकास व्हावा म्हणून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एकूण ४३ ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्त्यांचा विकास झाल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे़ पण आजही कित्येक दलित वस्त्यांमध्ये पाण्याची, पथदिवे, विजेची समस्या पाहायला मिळते. कुठे रस्त्याची, कुठे पाण्याची समस्या दिसते. चार वर्षांपूवी तयार केलेले रस्ते उखडून गेल्याने या वस्त्यांमध्ये मुख्य रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने खर्ची घातलेला निधी हा केवळ कागदोपत्री तर खर्चिला गेला नाही ना, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.सन २०११ ते २०१२ या वर्षात शासनाने कल्याण तालुक्याकरिता ५९. ८४ लाखांचा निधी दिला. सन २०१२ ते २०१३ मध्ये याच तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासाकरिता ३.६० लाखांचा निधी देण्यात आला. यातून एकूण ४३ ग्रामपंचायत हद्दीतील ५६ दलित वस्त्यांमध्ये विकासकामे झाल्याची माहिती कल्याण पंचायत समिती सूत्रांनी दिली. सन २०१३ ते सन २०१४ मध्ये याच तालुक्याकरिता शासनाने ४९ लाखांचा निधी दिला. त्यामुळे शासन कल्याण तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासावर भर देत आहे. त्याकरिता मोठा निधी देत असल्याचे दिसून येते, मात्र याच निधीचा वापर अन्य ठिकाणी केला जात आहे, तसेच सर्वसाधारण वस्त्याही दलित वस्ती म्हणून दाखविण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे़ याकडे जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर दलितांचा हा निधी परस्पर इतर ठिकाणी वापरला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.