शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सैन्यदलाविषयी समाजाचे औदासिन्य खेदजनक - अनुराधा गोरे

By admin | Updated: May 14, 2017 01:42 IST

आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे. मात्र सैन्यदलाविषयी समाजात असणाऱ्या उदासिनतेविषयी अत्यंत खेदजनक भावना असल्याचे प्रतिपादन लक्ष फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. अनुराधा गोरे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि आॅपरेशन सद्भावना’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात बोलत होत्या.विलेपार्ले येथील घैसास सभागृहात पार पडलेल्या या सोहळ््यात गोरे यांनी ‘आॅपरेशन सद्भावना’ विषयी सांगितले की, परमवीर चक्र विजेते ‘कसं मरावं’ ते सांगतात तर सैन्य दलातील जवान ‘जगावं कसं’ ते दाखवून देतात. विनायक गोरे या आपल्या पुत्राच्या हौताम्यानंतर आलेल्या उदासीनतेवर मात करत गोरे या २०-२२ वर्ष सैन्यदलाविषयी जागृकता निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.यावेळी, अलका गोडबोले यांनी १९६२ च्या चीनबरोबरच्या अपयशी युद्धातील प्रत्येक जण शूर होता. आणि या प्रत्येकाची कथा ही ‘युद्धस्य रम्या कथा’ नाही तर धगधगते निखारे आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना त्या म्हणाल्या की, १९४७-४८ च्या भारत-पाक युद्धापासून ते १९८७-९० चे ‘आॅपरेशन पवन’ या सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या युद्धांचा, त्यातील वीरांचा परिचय पुस्तकात करुन दिला आहे.याप्रसंगी, उपस्थित प्रमुख पाहुणे नागालँडचे राज्यपाल पद्मनाभजी आचार्य यांनी आपल्या मनोगातात ईशान्येकडील सर्व राज्यात वीज, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांच्या माध्यमातून कशी प्रगती होऊ शकेल याचा आढावा घेतला. या राज्यातील माणसांकडे स्वातंत्र्यानंतर कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे येथील माणसे बंडखोर झाल्याचे त्यांनी नमूद केले.