शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलाविषयी समाजाचे औदासिन्य खेदजनक - अनुराधा गोरे

By admin | Updated: May 14, 2017 01:42 IST

आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपले सैन्य दल गेली अनेक वर्ष उत्तम कामगिरी करत आहे. मात्र सैन्यदलाविषयी समाजात असणाऱ्या उदासिनतेविषयी अत्यंत खेदजनक भावना असल्याचे प्रतिपादन लक्ष फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि वीरमाता अनुराधा गोरे यांनी केले. अनुराधा गोरे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि आॅपरेशन सद्भावना’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात बोलत होत्या.विलेपार्ले येथील घैसास सभागृहात पार पडलेल्या या सोहळ््यात गोरे यांनी ‘आॅपरेशन सद्भावना’ विषयी सांगितले की, परमवीर चक्र विजेते ‘कसं मरावं’ ते सांगतात तर सैन्य दलातील जवान ‘जगावं कसं’ ते दाखवून देतात. विनायक गोरे या आपल्या पुत्राच्या हौताम्यानंतर आलेल्या उदासीनतेवर मात करत गोरे या २०-२२ वर्ष सैन्यदलाविषयी जागृकता निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत.यावेळी, अलका गोडबोले यांनी १९६२ च्या चीनबरोबरच्या अपयशी युद्धातील प्रत्येक जण शूर होता. आणि या प्रत्येकाची कथा ही ‘युद्धस्य रम्या कथा’ नाही तर धगधगते निखारे आहेत. या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगताना त्या म्हणाल्या की, १९४७-४८ च्या भारत-पाक युद्धापासून ते १९८७-९० चे ‘आॅपरेशन पवन’ या सर्वसामान्यांना अपरिचित असलेल्या युद्धांचा, त्यातील वीरांचा परिचय पुस्तकात करुन दिला आहे.याप्रसंगी, उपस्थित प्रमुख पाहुणे नागालँडचे राज्यपाल पद्मनाभजी आचार्य यांनी आपल्या मनोगातात ईशान्येकडील सर्व राज्यात वीज, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रांच्या माध्यमातून कशी प्रगती होऊ शकेल याचा आढावा घेतला. या राज्यातील माणसांकडे स्वातंत्र्यानंतर कोणी लक्ष दिले नाही, त्यामुळे येथील माणसे बंडखोर झाल्याचे त्यांनी नमूद केले.