शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहत नाही : शरद पवार यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 17:21 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : आप्पासाहेब पाटीलदोन्ही सभागृहात संख्याबळ नसतानाही राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही आणि त्याबाबत मी स्वप्न देखील पाहत नाही़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले़विधिमंडळ व संसदीय कार्यकिर्दीच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त व पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे खा़ शरद पवार यांचा सोलापुरात सर्वपक्षीय समितीच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ त्यानिमित्त खा़ पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते़ शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रपतीपदाबाबतचे स्पष्टीकरण दिले़ यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ भारत भालके, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, आ़ दिलीप सोपल, आ़ सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, मनोहर सपाटे, बळीराम साठे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ अवघे १४ असताना मी राष्ट्रपतीपदाची स्वप्नं पाहणं योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संख्याबळ जास्त आहे़ शिवाय उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर मोदींच्या संख्याबळात वाढ झाली आहे़ त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल़सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट सुरू आहे़ त्यामुळे विविध राज्यांच्या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळत आहे; मात्र ही लाट कायम राहणार नाही़ मोदी व भाजपासमोर कोणताही पक्ष सक्षम नाही. त्यामुळे लोक भाजपाच्या दिशेने मतदान करू लागले आहेत; मात्र ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले़-------------------राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी दौरा करणारसध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाची अवस्था सर्वसाधारण नाही़ जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा, नगरपालिका निवडणुकीने तर राष्ट्रवादी पक्ष शहरासह ग्रामीण भागातही विस्कळीत झाला आहे़ राष्ट्रवादीला पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यातील अनेक भागात दौरे करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.----------------साखर कारखाने पूर्वपदावर आणणारराज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीआय व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले़ --------------उजनीत येणारे घाण पाणी थांबविणारपुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पुणे महानगरपालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही शरद पवार यांनी सांगितले़ -------------अधिकाऱ्यांचा मनमानीपणा वाढला़़़़़सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे नियोजन योग्य व्हायला हवे़ गरज नसताना उजनीच्या कालव्यातून पाणी सोडले जाते़ त्यामुळे भाजपा सरकारच्या काळात मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही़ त्यामुळे अधिकारी मनमानी कारभार करून वाट्टेल ते करतात़ हे थांबणे गरजेचे असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले़