शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उद्योगांसाठीचे परवाने कमी करणार - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 03:34 IST

उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

औरंगाबाद : उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.आॅटो इंडस्ट्रीला लागणारे सुटे पार्ट्स तयार करण्यात मराठवाड्याचा हात कुणीही धरणार नाही. औरंगाबाद तर आॅटो हब आहे. त्यामुळे आगामी काळात हे शहर उद्योगात अग्रगण्य म्हणून गणले जाईल, असे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात उद्योग सुरू करणे म्हणजे कटकटींना आमंत्रण असे चित्र मागच्या सरकारच्या काळात होते. त्यामुळे उद्योग येण्याचे प्रमाण घटले होते; परंतु मागील काही महिन्यांचा आढावा घेतला तर भारतातील एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली आहे. ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात झाली आहे.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, शेंद्र्यात उद्योजकांनी घेतलेले अनेक प्लॉट पडून आहेत. मोठे प्लॉटस् घेतले, पण त्यावर उद्योग उभारले नाहीत. ते प्लॉट एमआयडीसीने ताब्यात घेऊन दुसऱ्याला द्यावेत. डीएमआयसीत देखील फक्त गुंतवणूक करण्यासाठी प्लॉट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भांडवल नसणाऱ्यांसाठी स्वतंत्र उद्योग झोन तयार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.