शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

उद्योगांसाठीचे परवाने कमी करणार - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 03:34 IST

उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

औरंगाबाद : उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या ७६ परवान्यांची अट कमी करून ती २६ वर आणली. परवान्यांची ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.आॅटो इंडस्ट्रीला लागणारे सुटे पार्ट्स तयार करण्यात मराठवाड्याचा हात कुणीही धरणार नाही. औरंगाबाद तर आॅटो हब आहे. त्यामुळे आगामी काळात हे शहर उद्योगात अग्रगण्य म्हणून गणले जाईल, असे सांगून सुभाष देसाई म्हणाले, राज्यात उद्योग सुरू करणे म्हणजे कटकटींना आमंत्रण असे चित्र मागच्या सरकारच्या काळात होते. त्यामुळे उद्योग येण्याचे प्रमाण घटले होते; परंतु मागील काही महिन्यांचा आढावा घेतला तर भारतातील एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के परकीय गुंतवणूकमहाराष्ट्रात आली आहे. ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात झाली आहे.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, शेंद्र्यात उद्योजकांनी घेतलेले अनेक प्लॉट पडून आहेत. मोठे प्लॉटस् घेतले, पण त्यावर उद्योग उभारले नाहीत. ते प्लॉट एमआयडीसीने ताब्यात घेऊन दुसऱ्याला द्यावेत. डीएमआयसीत देखील फक्त गुंतवणूक करण्यासाठी प्लॉट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. भांडवल नसणाऱ्यांसाठी स्वतंत्र उद्योग झोन तयार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.