शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

मुद्रा योजनेबाबत उदासीनता

By admin | Updated: November 18, 2015 00:12 IST

पंतप्रधानांकडे तक्रार : समविचारी मंचातर्फे ५० तक्रारी दाखल

रत्नागिरी : पंतप्रधान मुद्रा योजना राबविण्याकामी विविध वित्तीय संस्था उदासीनता दाखवत आहेत. याविरोधातील सुमारे ५० तक्रारी पंतप्रधान तसेच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियापर्यंत दाखल करण्यात आल्याची माहिती समविचारी मंचातर्फे देण्यात आली आहे.पंतप्रधान मुद्रा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली आहे. मात्र, या योजनेच्या लाभार्थींना विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अनेक हेलपाटे मारावे लागतात. एवढे करुनही त्यांना कर्ज नाकारले जाते. कर्जप्रकरणे नाकारलेल्यांची एक बैठक शहरातील पतितपावन मंदिरात रविवारी घेण्यात आली. यावेळी समविचारी मंचचे जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर यांनी यावेळी आवश्यक कागदपत्र पूर्ण करुनही कर्ज मागणी करणाऱ्यांना परत पाठवल्याचे नमूद केले. तालुकाध्यक्ष संजय नागवेकर यांनी संघटनेचा उद्देश सांगून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लाभार्थींना योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या या वित्तीय संस्थांबाबतच्या तक्रारी थेट पंतप्रधानांकडे पाठवाव्यात, असे ठरवण्यात आले. त्यानुसार बँक आॅफ इंडिया १४, बँक आॅफ महाराष्ट्र २३, कॅनरा बँक २, स्टेट बँक ४, कॉर्पोरेशन बँक आणि बँक आॅफ बरोडा प्रत्येकी एक आणि अन्य चार अशा एकूण ५० तक्रारी पंतप्रधानांसह अन्य संबंधितांना पाठविण्यात आल्या. याआधीही याबाबतचे निवेदन समविचारी मंचाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सादर केले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँक आॅफ इंडियाच्या प्रबंधकांकडून सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेबाबत सर्वत्र अशी परिस्थिती असल्याने खेड, दापोली, चिपळूण, गुहागर या चार तालुक्यांसाठी चिपळूण या ठिकाणी लवकरच एका सभेचे आयोजन करण्यात आल्याचे मंचातर्फे सांगण्यात आले. यावेळी समविचारी मंचचे प्रमुख बाबा ढोल्ये, जिल्हाध्यक्ष अशोक वाडेकर, तालुकाध्यक्ष संजय नागवेकर, शहर अध्यक्ष राजू चव्हाण, युवा संघटक नीलेश आखाडे तसेच बहुसंख्य तक्रारदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)जाहिरात फसवी : सामान्यांपर्यंत योजना पोहण्यास अडचणशासनाच्या मुद्रा योजनेंतर्गत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून कर्ज घेताना कोणत्याही कागदपत्रांची गरज नसल्याची जाहिरात केली जाते. मात्र, बँकांमध्ये गेल्यावर योजनेतील कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रांची भली मोठी यादीच दिली जाते. त्यामुळे ही योजना फसवी असल्याची ओरड केली जात आहे. सामान्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी ही योजना सुरू केली असली तरी ती सामान्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.