मुंबई : एसटीच्या बिघडत चाललेल्या आर्थिक स्थितीचा फटका गेल्या काही वर्षात कर्मचा:यांना बसत आहे. नव्याने भरती होणा:या कर्मचा:यांना मुळातच कमी पगार दिला जात असल्याने अनेक जण एसटीला सोडचिठ्ठी देत नोकरीचा दुसरा पर्याय निवडत आहेत. साधारण दीड वर्षापूर्वी एसटीत करण्यात आलेल्य आगारप्रमुखांच्या भरतीनंतर जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे समोर आले आहे. या सोडचिठ्ठीनंतर पुन्हा या जागा कमी पगारावर भरण्याचे काम एसटीकडून करण्यात आले असून काही आगारप्रमुख एसटी सोडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाकडून दोन वर्षापूर्वी एसटी अधिका:यांची भरती करण्यात आली होती. या भरतीत आगारप्रमुखांचाही समावेश होता.
एसटीचे तब्बल 247 आगार असून, या आगारांची जबाबदार व्यक्ती म्हणून ते काम करतात. गाडय़ांचे नियोजन, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे प्रश्न तसेच प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर त्यांच्याकडून भर दिला जातो. असे असतानाच भरती करण्यात आलेल्या आगारप्रमुखांनी एसटीचा पगार पाहताच एसटीला सोडचिठ्ठी दिल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन आगारप्रमुख नेमण्यात आले आहेत. आतार्पयत तब्बल 50 टक्के आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली असून भरतीत निवड झाल्यावर तर 25 टक्के आगारप्रमुख हे त्या पदावर रुजूच झाले नसल्याचे एसटीतील सूत्रंनी सांगितले.
पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात. महत्त्वाची बाब म्हणजे एसटीच्या आगारप्रमुखांचे गेल्या दोन वर्षात सोडण्यात येणारे प्रमाण पाहता यापुढे होणा:या भरतीत आगारप्रमुखांकडून पाच वर्षाचा बॉन्ड लिहून घेतला जाणार आहे. यामुळे निदान पाच वर्षे तरी ती व्यक्ती आगारप्रमुख म्हणून काम करेल, असे सूत्रंकडून सांगण्यात आले.
च्दोन वर्षात जवळपास 150 आगारप्रमुखांनी एसटीला सोडचिठ्ठी दिली आहे. आगारप्रमुख म्हणून नेमणूक झाल्यावर या प्रमुखांचा मूळ पगार हा 7 हजार 750 रुपये एवढा दिला जातो.
च्त्यामुळे पगार कमी असल्याने अनेक जण दुसरा पर्याय मिळेर्पयत आगारप्रमुखाची नोकरी करतात आणि दुसरी नोकरी मिळताच त्याला सोडचिठ्ठी देतात.