शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बदल्यांबाबत राज्यमंत्र्यांच्या दबावाने विभागप्रमुख हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:15 IST

१० आॅगस्टपर्यंत मुदत; आधी दिली स्थगिती, त्यानंतर अनुमती

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गट-ब अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विभागप्रमुख, संचालक किंवा सचिवांकडून आलेले प्रस्ताव राज्यमंत्र्यांकडून बदलले जाण्याचे प्रकार वाढीस लागल्याने आता या अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

बदली अधिनियम; २००६ नुसार विभागप्रमुखांनी दिलेल्या बदलीच्या प्रस्तावात राज्यमंत्र्यांनी बदल केला तर त्यांना त्यासाठीचे कारण फाइलवर लेखी नमूद करावे लागते. तशी पाळी येऊ नये, म्हणून विभागप्रमुखांनीच प्रस्तावात बदल करावा, असा दबाव राज्यमंत्र्यांकडून येत असल्याच्या तक्रारी अधिकारी महासंघाकडे आल्यानंतर महासंघाने समुपदेशनाने बदल्यांची मागणी पुढे केली. महासंघाने तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. समुपदेशनात बदलीसाठी संबंधित अधिकाºयास पर्याय दिले जातात.

यंदा कोरोनामुळे बदल्यांना एक वर्ष स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने आधी घेतला होता. मात्र, नंतर १५ टक्के बदल्यांना अनुमती दिली. या बदल्या १० आॅगस्टपर्यंत करावयाच्या असल्याने सध्या मंत्रालयात बदल्यांसाठी अर्थपूर्ण व्यवहारांना गती आली आहे. गट बच्या अधिकाºयांच्या बदल्यांचे अधिकार कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिलेले आहेत. नियमानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाºयांची नियमित तर हा कार्यकाळ पूर्ण न केलेल्या अधिकाºयांची विनंती बदली केली जाते. १५ टक्क्यांच्या मर्यादेत या वेळी दोन्ही बदल्या करावयाच्या आहेत.

विविध विभागे प्रमुख, संचालक किंवा सचिवांनी या मर्यादेत बदल्यांचे प्रस्ताव राज्यमंत्र्यांकडे पाठविले, पण काही बदल्यांचे प्रस्ताव मागे घेण्यास सांगणे, काही नावे नव्याने समाविष्ट करण्यास सांगणे यासाठी राज्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :ministerमंत्री