शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांची बदली

By admin | Updated: June 29, 2017 02:07 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या बदलीनंतर आता मंत्री गिरीश बापट यांनी या विभागात वर्षानुवर्षे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या बदलीनंतर आता मंत्री गिरीश बापट यांनी या विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अत्यंत प्रभावी अशा दोन्ही सहआयुक्तांना मुंबईबाहेर काढले आहे. सहआयुक्त ओ. शो. साधवानी यांची नाशिकला, तर सु.गं. अन्नपुरे यांची अमरावतीला रवानगी करण्यात आली आहे.औषध विभागाचे सहआयुक्त ओ.शो. साधवानी यांची एकूण नोकरी २७ वर्षे झाली असून २२ वर्षे ते ठाणे, रायगड आणि मुंबईतच कार्यरत होते. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी विविध पदे सांभाळणारे साधवानी विभागाचे बडे प्रस्थ मानले जातात. लोकमतने ‘आरोग्यम ‘धन’संपदा’ या वृत्तमालिकेत या अधिकाऱ्यांवर प्रकाश टाकला होता. अन्नपुरे यांच्या बदलीचे आदेश १४ जून रोजी निघाले. तात्काळ कार्यमुक्त करावे असे लेखी सांगण्यात आले तरी अद्याप अन्नपुरे यांना नवीन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी कार्यमुक्त केलेले नाही. अन्नपुरे यांच्या जागी नवीन अधिकारी द्यावेत, अशी मागणी आम्ही केली आहे; पण ते अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाले की त्यांना कार्यमुक्त केले जाईल, असे आयुक्त डॉ. दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दीर्घकाळ मुंबई, ठाण्यातच ठाण मांडून बसलेल्या व ज्यांच्या एकूण सेवेपैकी ८० टक्के नोकरी फक्त पुणे, मुंबई आणि ठाण्यातच झाली अशांच्या बदल्या करण्याची शिफारशी तत्कालिक आयुक्त महेश झगडे यांच्या लोकमत चौकशी समितीने केली होती. ती शिफारशी स्वीकारली, पण त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. लोकमतने हा विषय सातत्याने लावून धरला होता. अखेर मंत्री बापट यांनी या दोन्ही बड्या अधिकाऱ्याची बदली केली आहे.साधवानी यांच्याकडे विधी आयुक्तांचाही पदभार होता. एकाच अधिकाऱ्याकडे मुख्यालयातील ही महत्वाची कामे दीर्घ काळ कोणामुळे व कशी आली हा संशोधनाचा विषय आहे. दोन्ही विभाग एकाच व्यक्तीकडे असल्याने डब्ल्यूएचओच्या फाईली तेथे देणे अत्यंत धोक्याचे असल्याचे निरीक्षक दक्षता विभागाचे सहसंचालक हरिष बैजल यांनी लेखी दिले होते. बैजल अडचणीचे ठरतात हे लक्षात आल्यानंतर या विभागातील अधिकाऱ्यांच्या टोळीने बैजल यांचीच बदली घडवून आणली होती. सगळ्यांनाच हवे मुंबई, ठाणे !मुंबई, ठाणे, पुणे आणि फारतर रायगड हे जिल्हे कोणालाही सोडायचे नाहीत. सहाय्यक आयुक्त विनिता थॉमस यांची सेवा २५ वर्षे झाली. त्यातली २३ वर्षे त्या ठाणे, मुंबईबाहेर गेलेल्या नाहीत. सहाय्यक आयुक्त नि. मो. गांधी २३ वर्षातले १५ वर्षाहून अधिक काळ मुंबईत आहेत. श्रीमती ह.मा. आहाळे एकूण सेवेच्या २३ वर्षापैकी २० वर्षे पुण्यासह ठाणे, मुंबई या तीन जिल्ह्यात कार्यरत आहेत. डॉ. रा. ना. तिरपुडे हे २४ वर्षापैकी १७ वर्षे याच भागात आहेत. श्रीमती प्रे. प्र. म्हानवर यांची सेवा २३ वर्षे झाली. त्यातले १६ महिने त्या गडचिरोलीला आणि फक्त १५ दिवस सांगलीला होत्या. उर्वरित २० वर्षाहून अधिकचा काळ त्या याच भागात आहेत. प्र. ब. मुंदडा यांची लाच मागितल्याप्रकरणी आणि अन्य एका प्रकरणात विभागीय चौकशी सुरु आहे; तरीही हे गृहस्थ २४ वर्षातील दहा वर्षाहून अधिक काळ याच भागात आहेत. ही यादी तब्बल ५० ते ६० अधिकाऱ्यांची आहे. यावर आता बापट काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.आम्ही बदल्यांचे आदेश काढले आहेत. प्रशासनाचे त्याचे पालन केले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीमुळे काम अडायला नको. अन्य अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन काम चालू ठेवता येते. प्रशासन हे व्यवस्थेवर चालते व्यक्तींवर नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाचे पालन आणि सन्मान झाला पाहिजे. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांनाही लवकरच बदलले जाणार आहे.- गिरीष बापट, अन्न व औषधी प्रशासन मंत्री.