शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पहाटे दाट धुके, दुपारी कडक ऊन!

By admin | Updated: April 12, 2017 21:08 IST

गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 12 : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशापेक्षा जादा तापमानाचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना बुधवारी पहाटेच्या सुमारास धुक्याच्या दाट दुलईचा आल्हाददायक आनंद मिळाला. पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत शहर अक्षरश: धुक्यात गायब झाले होते. पहाटे जॉगिंग, वॉकिंगला बाहेर पडणाऱ्यांनी धुक्याचा हा सुखद धक्का अनुभवला. दुपारनंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवला. दुपारी सांगलीचा पारा ४२ अंशापर्यंत गेला होता.गेल्या आठवड्याभरापासून सांगलीकर उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. उन्हाच्या तडाख्याने अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पसरलेले धुके आणि थंडीमुळे शहरवासीयांना उकड्यातून काहीसा थंडावा मिळाला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.पहाटे लवकर सुरू होणाऱ्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यांवर कामावर जाणाऱ्यांची, तसेच फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली. हिमवर्षाव झाल्यानंतर किंवा तीव्र थंडीची लाट आल्यानंतर जशा तोंडातून गरम वाफा बाहेर पडतात, तसाच अनुभव बुधवारी सकाळी नागरिकांना आला. गावभाग, कृष्णा नदीकाठ परिसर, आमराई, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग, कोल्हापूर रस्ता आदी भागातून आठ-साडेआठनंतरच नागरिकांची नित्यकामाची लगबग जाणवू लागली. धुक्याचे हे वातावरण टिपण्यासाठी अनेकांनी सेल्फी काढून घेतली. अनेकांनी सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईकांशी, हा धुक्याचा आनंद लुटण्यासाठी संपर्क साधला होता. सकाळच्या हुडहुडी भरविणाऱ्या या गारव्याचा आनंद काही तासच टिकला. दुपारनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. दुपारच्या सुमारास तब्बल ४२ अंशावर पारा गेला होता.शिराळा पश्चिम भाग गारठलाशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके पसरले होते. वाहनधारकांना वाहनांचे दिवे लावूनच वाहन चालवावे लागत होते. शिराळा तालुक्याचे पश्चिम भागातील कोककणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पावलेवाडी खिंडीपासून चांदोलीपर्यंत मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी नऊपर्यंत दाट धुके होते. हवेत थंडी होती, गारठा जाणवत होता. त्यामुळे शेतीची कामे करण्यात अडथळे निर्माण झाले होते. शाळकरी मुलांना परीक्षेसाठी धुक्यातून वाट काढतच जावे लागले.