शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यामध्ये डेंग्यूचे थैमान; एका दिवसांत तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 05:44 IST

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण : पुणे, ठाणे, खान्देशातही फैलाव

पुणे : राज्यात सध्या डेंग्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी दिवसभरात जळगावात दोन तर लातूरमध्ये एक अशा तिघांचे बळी गेले, तर राज्यात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महापुरानंतर सावरणाऱ्या कोल्हापूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे येथे लागण झाली आहे.महापूरग्रस्त कोल्हापूर विभागात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या १,६३० झाली असून, पुण्यात १३६२, ठाणे विभागात १३०३ रूग्ण आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

जळगाव शहरात यावर्षी ४५ रुग्ण आढळून आले आहेत. नंदुरबार शहरात २८ रुग्ण असून खासदार डॉ. हिना गावीत यांनाही डेंग्यू झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद शहरात सात बळी गेले १ आॅक्टोबरपासून आतापर्यंत ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

कशामुळे होते पैदास?

डेंग्यूचे डास घरात व आसपासच्या भागात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात असतात. त्यामुळे महापूर वा दुष्काळ असला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते. ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यू