शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू आणि क्षयरोगाचा विळखा

By admin | Updated: July 13, 2017 01:56 IST

मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईमध्ये क्षयरोग (टीबी) आणि डेंग्यूने थैमान घातल्याची श्वेतपत्रिका प्रजा फाउंडेशनने बुधवारी जाहीर केली आहे. क्षयरोगामुळे गेल्या वर्षभरात दररोज साधारण १८ लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब प्रजाने माहिती अधिकारात उघड केली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांतही गेल्या पाच वर्षांत अडीच पटीने वाढ झाल्याचे भीषण वास्तव प्रजाने समोर आणले आहे.प्रजाने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार, क्षयरोगाच्या रुग्णांत सुमारे १४ हजार रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१२-१३ साली ३६ हजार ४१७ क्षयरुग्ण असलेल्या मुंबईला क्षयमुक्त करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. कारण गेल्या चार वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली असून, क्षयरुग्णांचा आकडा तब्बल ५० हजारांवर गेला आहे. तर दररोज सरासरी १८ लोकांचा मृत्यू क्षयरोगाने होत असताना क्षयनिर्मूलनासाठी असलेल्या डॉट्स केंद्रांत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१२ साली ३० हजार ८२८ रुग्ण डॉट्स केंद्रांत उपचार घेत होते. याउलट २०१६मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ हजार ७६७पर्यंत घसरली आहे.गेल्या पाच वर्षांत डेंग्यूनेही मुंबईत हात-पाय पसरल्याची माहिती या वेळी समोर आली आहे. २०१२-१३ सालात डेंग्यूच्या ४ हजार ८६७ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात २६५ टक्क्यांनी वाढ होत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०१६-१७मध्ये तब्बल १७ हजार ७७१ रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डेंग्यूला आळा घालण्यात महापालिकेला अपयश आल्याचे दिसते.नगरसेवक उदासीनक्षयरोगाबाबत नगरसेवकांमध्येही उदासीनता दिसत असल्याचे प्रजाचे म्हणणे आहे. कारण माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, डॉट्समध्ये क्षयरोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी १० टक्क्यांनी गळती होत आहे. तरीही गेल्या पाच वर्षांत महापालिकेत नगरसेवकांनी क्षयरोगावर केवळ ४५ प्रश्न विचारले आहेत. याउलट रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंदे्रयांच्या नामकरणाबाबत नगरसेवकांनी ६८ प्रश्न विचारले आहेत. यावरून नगरसेवकांना रुग्णालयातील सेवेहून त्याचे नाव अधिक महत्त्वाचे वाटते, असा निष्कर्ष निघतो.>८९,८१८ मुंबईकरांचा गतवर्षी मृत्यूएप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात ८९,८१८ मुंबईकरांनी मृत्यू झाल्याची नोंद पालिकेत आहे. त्यात मलेरियामुळे १२७ मृत्यू झाले.डेंग्यूमुळे जीव गमावलेल्या नागरिकांची संख्या १४८ आहे. क्षयरोगाने तब्बल ६ हजार ४७२ रूग्णांचा जीव घेतला.अतिसारामुळे २२५ मुंबईकरांना जीव गमवावा लागला. कॉलरामुळे ८, तर टायफॉईड ६ आणि एचआयव्ही एड्समुळे ४०४ रूग्णांचे जीव गेले.मधुमेहामुळेही एकूण २ हजार ६ ७५ नागरिकांचा मृत्यूू झाल्याची नोंद आहे.हायपर टेन्शनमुळे तब्बल ४ हजार ४३८ नागरिकांचा अकाली मृत्यू झाला आहे.७५ हजार ३१५ मुंबईकरांच्या मृत्यूची नोंद इतर कारणाने झाली आहे.>डेंग्यूके पूर्व वॉर्डमध्ये २२४ रुग्ण आढळले.एल वॉर्डमध्ये १४४ रुग्णांची नोंद आहे.आर उत्तर वॉर्डमध्ये १०८ रुग्णांना डेंग्यू झाला.क्षयरोग एल वॉर्डमधील कुर्ला परिसरात टीबीचे १ हजार २५४ रुग्ण आढळले आहेत.एच पूर्व वॉर्डमधील सांताक्रुझ विभागात ६५९ रुग्णांची नोंद आहे.आर दक्षिण वॉर्डमधील कांदिवलीमध्ये ४९३ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे निदर्शनास आले आहे.अतिसाराचा चिमुरड्यांना धोकामुंबईतील चिमुरडे अतिसाराचे बळी पडत असल्याचेही प्रजाने उघड केले आहे. कारण अतिसारामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सुमारे ३ पैकी १ मृत्यू हा ४ वर्षे व त्याखालील वयाच्या बालकांचा आहे.