शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमुळे लोकशाही धोक्यात!

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून

गणेश धुरी,  नाशिककेंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून, केंद्राचा हा प्रयत्न म्हणजे राज्ये बळकावण्याचाच प्रकार आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता त्यांच्या अनेक भूमिकांवर घणाघाती टीका केली. रविवारी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही. भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती; परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, असे उद्धव यांनी भाजपला ठणकावले. लहान राज्यांचा आग्रह धरणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, लहान राज्य कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी? तुमच्या अशा धोरणामुळे लोकशाही धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? मित्राला सावध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.आमचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाही. देशाच्या सुरक्षेच्या आड येणाऱ्या पाकिस्तानशी दोन हात करायचे, पठाणकोट हल्ल्याचा बदला घ्यायचा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्ही मराठी आणि अमराठी असा वाद उकरत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. > कन्हैयाचा जन्म का झाला?आजच्या युवा पिढीला कोणी मार्गदर्शन करण्यास तयार नाही. रोहित वेमुला गेला. हार्दिकला देशद्रोही ठरविले. आता कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुळातच कन्हैया जन्माला का आला? त्याला जन्माला कोणी घातले, याचा विचार ज्याने त्याने करावा, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.एक हाती सत्ता हेच उद्दिष्टकेवळ नाशिक महापालिकेवरच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांवर एक हाती सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. शिवसैनिकांनीही त्यासाठी झटले पाहिजे. आज राज्य दुष्काळात होरपळत असताना माझ्या शिवसैनिकांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही उद्धव यांनी केले.> ...तरच युती होईलआगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपला युती व्हावी, असे वाटत असेल तर त्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर वर्षानुवर्षे युती झाली तो मुद्दा हवा.दोन्ही बाजूची गरज असेल तरच युती होईल, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.