शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

केंद्र सरकारमुळे लोकशाही धोक्यात!

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून

गणेश धुरी,  नाशिककेंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून, केंद्राचा हा प्रयत्न म्हणजे राज्ये बळकावण्याचाच प्रकार आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता त्यांच्या अनेक भूमिकांवर घणाघाती टीका केली. रविवारी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही. भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती; परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, असे उद्धव यांनी भाजपला ठणकावले. लहान राज्यांचा आग्रह धरणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, लहान राज्य कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी? तुमच्या अशा धोरणामुळे लोकशाही धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? मित्राला सावध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.आमचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाही. देशाच्या सुरक्षेच्या आड येणाऱ्या पाकिस्तानशी दोन हात करायचे, पठाणकोट हल्ल्याचा बदला घ्यायचा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्ही मराठी आणि अमराठी असा वाद उकरत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. > कन्हैयाचा जन्म का झाला?आजच्या युवा पिढीला कोणी मार्गदर्शन करण्यास तयार नाही. रोहित वेमुला गेला. हार्दिकला देशद्रोही ठरविले. आता कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुळातच कन्हैया जन्माला का आला? त्याला जन्माला कोणी घातले, याचा विचार ज्याने त्याने करावा, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.एक हाती सत्ता हेच उद्दिष्टकेवळ नाशिक महापालिकेवरच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांवर एक हाती सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. शिवसैनिकांनीही त्यासाठी झटले पाहिजे. आज राज्य दुष्काळात होरपळत असताना माझ्या शिवसैनिकांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही उद्धव यांनी केले.> ...तरच युती होईलआगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपला युती व्हावी, असे वाटत असेल तर त्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर वर्षानुवर्षे युती झाली तो मुद्दा हवा.दोन्ही बाजूची गरज असेल तरच युती होईल, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.