शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

केंद्र सरकारमुळे लोकशाही धोक्यात!

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून

गणेश धुरी,  नाशिककेंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून, केंद्राचा हा प्रयत्न म्हणजे राज्ये बळकावण्याचाच प्रकार आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता त्यांच्या अनेक भूमिकांवर घणाघाती टीका केली. रविवारी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही. भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती; परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, असे उद्धव यांनी भाजपला ठणकावले. लहान राज्यांचा आग्रह धरणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, लहान राज्य कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी? तुमच्या अशा धोरणामुळे लोकशाही धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? मित्राला सावध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.आमचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाही. देशाच्या सुरक्षेच्या आड येणाऱ्या पाकिस्तानशी दोन हात करायचे, पठाणकोट हल्ल्याचा बदला घ्यायचा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्ही मराठी आणि अमराठी असा वाद उकरत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. > कन्हैयाचा जन्म का झाला?आजच्या युवा पिढीला कोणी मार्गदर्शन करण्यास तयार नाही. रोहित वेमुला गेला. हार्दिकला देशद्रोही ठरविले. आता कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुळातच कन्हैया जन्माला का आला? त्याला जन्माला कोणी घातले, याचा विचार ज्याने त्याने करावा, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.एक हाती सत्ता हेच उद्दिष्टकेवळ नाशिक महापालिकेवरच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांवर एक हाती सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. शिवसैनिकांनीही त्यासाठी झटले पाहिजे. आज राज्य दुष्काळात होरपळत असताना माझ्या शिवसैनिकांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही उद्धव यांनी केले.> ...तरच युती होईलआगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपला युती व्हावी, असे वाटत असेल तर त्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर वर्षानुवर्षे युती झाली तो मुद्दा हवा.दोन्ही बाजूची गरज असेल तरच युती होईल, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.