शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

केंद्र सरकारमुळे लोकशाही धोक्यात!

By admin | Updated: April 25, 2016 00:41 IST

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून

गणेश धुरी,  नाशिककेंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करून उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांमुळे लोकशाही धोक्यात येत असून, केंद्राचा हा प्रयत्न म्हणजे राज्ये बळकावण्याचाच प्रकार आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख न करता त्यांच्या अनेक भूमिकांवर घणाघाती टीका केली. रविवारी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. युती आहे काय, नाही काय काही फरक पडत नाही. भाजपसोबत आमची युती सत्तेसाठी नव्हे, तर केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर होती; परंतु तोही मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, असे उद्धव यांनी भाजपला ठणकावले. लहान राज्यांचा आग्रह धरणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी सवाल केला. ते म्हणाले, लहान राज्य कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी? तुमच्या अशा धोरणामुळे लोकशाही धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, प्रत्येक प्रश्नावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. दुष्काळाच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महाराष्ट्रावर कोसळलेले हे भयंकर संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पक्षभेद आणि मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? मित्राला सावध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.आमचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व नाही. देशाच्या सुरक्षेच्या आड येणाऱ्या पाकिस्तानशी दोन हात करायचे, पठाणकोट हल्ल्याचा बदला घ्यायचा, हे आमचे हिंदुत्व आहे, असे सांगत आम्ही मराठी आणि अमराठी असा वाद उकरत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. > कन्हैयाचा जन्म का झाला?आजच्या युवा पिढीला कोणी मार्गदर्शन करण्यास तयार नाही. रोहित वेमुला गेला. हार्दिकला देशद्रोही ठरविले. आता कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मुळातच कन्हैया जन्माला का आला? त्याला जन्माला कोणी घातले, याचा विचार ज्याने त्याने करावा, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.एक हाती सत्ता हेच उद्दिष्टकेवळ नाशिक महापालिकेवरच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिका व जिल्हा परिषदांवर एक हाती सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. शिवसैनिकांनीही त्यासाठी झटले पाहिजे. आज राज्य दुष्काळात होरपळत असताना माझ्या शिवसैनिकांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही उद्धव यांनी केले.> ...तरच युती होईलआगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपला युती व्हावी, असे वाटत असेल तर त्यासाठी ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर वर्षानुवर्षे युती झाली तो मुद्दा हवा.दोन्ही बाजूची गरज असेल तरच युती होईल, असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.