शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

लोकशाहीच अमान्य आहे का?

By admin | Updated: May 30, 2014 01:13 IST

अ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्‍या अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत नाही. साहित्य वाचकांना हवा तो

अ.भा. मराठी साहित्य महामंडळ : ३१ मेच्या बैठकीत निवडणूक रद्द करण्याचा प्रस्तावराजेश पाणूरकर - नागपूरअ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्‍या अ.भा. साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत  नाही. साहित्य वाचकांना हवा तो अध्यक्ष निवडीचे स्वातंत्र्य देण्यापेक्षा महामंडळ सदस्यांनाच  अध्यक्ष निवडीचे संपूर्ण अधिकार देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासंदर्भात साहित्य  महामंडळाची बैठक ३१ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली असून, संमेलनाध्यक्षपदाची  निवडणूकच रद्द करण्याचा प्रयत्न आहे.      याविरोधात तमाम मराठी वाचक, साहित्य रसिक आणि साहित्यिकांनी मत व्यक्त केले असून,  महामंडळाला लोकशाहीच अमान्य आहे का? असा सवाल करण्यात आला आहे.           साहित्य  संमेलनाध्यक्ष निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते.मतदानाचा अधिकार द्याकाही निवडक मतदारांनाच मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक घटकसंस्थेला केवळ १७५  सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यात विदर्भ साहित्य संघाचे सदस्य सात हजार आहेत. मुंबई,  मराठवाडा साहित्य परिषदेची सदस्य संख्या एक हजार ते बाराशे आहे. पण त्यांनाही १७५ मतांचाच अधिकार आहे. त्यामुळे सर्व घटक साहित्य संस्थाच्या एकूण २0  हजार मतदारांना संमेलनाध्यक्ष निवडीचा अधिकार असावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत  आहे. या मागणीचा परिणाम म्हणूनच गेल्या दोन वर्षांंंपूर्वी मतदारांची संख्या चौथ्यांदा वाढविण्यात  आली. मतदार संख्या वाढविण्यात आली असली तरीही महाराष्ट्रातल्या १३ कोटी साहित्य  रसिकांचे प्रतिनिधित्व ही संख्या करू शकत नाही. पण किमान लोकशाही पद्धतीने निवडणूक होत  असल्याने रसिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. त्यात आता महामंडळ निवडणूक रद्द करून  संमेलनाध्यक्ष थोपविणार असेल तर लोकशाहीच अमान्य करण्यासारखे आहे. महामंडळाचे  निवडक सदस्य १३ कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात? असा सवाल  महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांनी केला आहे. काही साहित्यिक संमेलनाध्यक्षपदासाठी  निवडणूक लढविण्याचा विरोध करतात. अशा काही साहित्यिकांना महामंडळ संमेलनाध्यक्ष करू  इच्छिते. यंदा यात ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना संमेलनाध्यक्ष करण्याची तयारी सुरू असल्याचे  कळते. पण ना.धों. महानोर लोकशाही पद्धतीने विधान परिषदेत जाऊ इच्छितात तर संमेलनाध्यक्ष  पदासाठी ते निवडणूक का नाकारत आहेत? असाही तिखट सवाल आता मराठी जनतेने केला  आहे. साहित्य महामंडळाचे विश्‍व मराठी साहित्य संमेलन घटनादुरुस्तीच्या मुद्यावर अडचणीत  सापडले असताना, घटनाबाह्य निवडणूकच रद्द करण्याचा विचारही करण्याचे धाडस महामंडळ  कसे काय करू शकते? आतापर्यंंंत निवडणूक रद्द करून संमेलनाध्यक्षांची निवड करण्याबाबत  अनेक वेळा विचार करण्यात आला. पण प्रत्येक बैठकीत निवडणुकांशिवाय पर्याय नाही, असाच  निर्णय घेण्यात आलेला आहे. हे चित्र स्पष्ट असताना निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न करणे  चुकीचे ठरते. यापेक्षा साहित्यावर प्रेम करणार्‍या सर्व घटक संस्थांच्या सदस्यांना मतदानाचा  अधिकार देण्याची मागणी समोर येते आहे. ३१ मेच्या महामंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, ते  कळेलच.(प्रतिनिधी)