शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेपुढे सेनेला जनतेचा विसर!

By admin | Updated: December 6, 2014 03:49 IST

सत्तेत सहभागी होताना शिवसेनेने जनभावनेचा आदर राखत एकत्र आल्याचा दावा केला

अतुल कुलकर्णी, मुंबई सत्तेत सहभागी होताना शिवसेनेने जनभावनेचा आदर राखत एकत्र आल्याचा दावा केला. मात्र आठच दिवसांपूर्वी राज्यपालांना भेटून दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आपण काही मागण्या केल्या होत्या; त्याविषयी आपली भूमिका नेमकी काय असेल, हे सांगण्याचे सौजन्य मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना दाखवले नाही. शेतकऱ्यांना एकरी किमान दहा हजार रुपये मदत मिळेल का? दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ होईल का? उजनीचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल का? जायकवाडी धरणात १८ टीएमसी पाणी सोडले जाईल का? या एकाही प्रश्नाचे उत्तर न देताच शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे. शपथ घेताना सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले, उद्धव ठाकरेंना वंदन केले. नंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मात्र एकाही मंत्र्याने राज्यपालांना दिलेल्या निवेदनातील एकाही मागणीचा साधा उल्लेखही केला नाही.तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांना घेऊन उद्धव ठाकरे मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेना तुमच्या सोबत आहे हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे भावनिक आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. दुष्काळी दौऱ्यात महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर आरोप करणारी शिवसेना शुक्रवारी मात्र सत्तेसाठी त्याच खडसेंच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे पहावयास मिळाले.राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, १८३ अपूर्ण प्रकल्पांसाठी १३,५८२ कोटी रुपये लागणार आहेत, हा निधी विशेष बाब म्हणून द्यावा, शिवाय २२०० कोटीचे ७६ प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी पडून आहेत ते तातडीने मान्य करावेत, अशा धाडसी मागण्यांचाही समावेश होता. मात्र सत्तेत जातानाही आम्ही त्या मागण्या विसरलेलो नाहीत, हे शिवसेनेने सांगितले असते तर दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. राज्यपालांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. आता सेना सत्तेत सहभागी आहे तेव्हा त्यांनी राज्यपालांना दुष्काळी भागाचा दौरा काढण्यासाठी राजी केले पाहिजे, शिवाय त्यांनी निवेदनात केलेल्या मागण्या पूर्ण करून दाखविण्याची आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे हे सगळे सेनेने साध्य केले तरच सेनेच्या उक्ती आणि कृतीत अंतर नाही, असे म्हणता येईल.