शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सांगलीत तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

By admin | Updated: April 30, 2017 22:02 IST

सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 30 - सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. माधवनगर रस्त्यावरील कलानगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी भरदिवसा अडीच वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने डोके ठेचल्याने रवींद्र काहीक्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र भोराप्पा शिवाजी आमटे (२४, अहिल्यानगर) याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत.
 
मारामारी, दहशत माजविणे असे दोन गुन्हे रवींद्रविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिका-यांना सादर केला होता. प्रांताधिका-यांनी त्याला सहा महिन्यापूर्वी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. २८ मार्च २०१७ रोजी तो पुन्हा शहरात आश्रयाला आला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला पकडले होते. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला पुन्हा सांगली जिल्ह्यातून बाहेर सोडले होते. गुढीपाडव्यालाही तो गुढी उभा करण्यासाठी घरी आला होता. पण पुन्हा तो लगेच निघून गेला होता. रविवारी त्याचा भाऊ राहुल याचा वाढदिवस होता. यानिमित्त भावाची अहिल्यानगरमध्ये पोस्टर लावण्यात आली होती. वाढदिवस मोठा साजरा करायचा असल्याने रवींद्र सकाळी अकरा वाजता आला होता. 
 
भावाच्या वाढदिवसाला मंडप उभा करण्यासाठी रवींद्र दुपारी एक वाजता पाच मित्रांसोबत घेऊन साखर कारखान्यावरील कामगार भवनमध्ये गेला होता. तिथे तो मंडप ठरविणार होता. मात्र मंडप मालकाने मंडप शिल्लक नसल्याचे सांगितले. तेथून तो मित्रांना घेऊन जुना बुधगावरस्तामार्गे कलानगर येथील माळी मंडप यांच्याकडे गेला होता. तिथे त्यांना मंडप, डेकोरेशन व ध्वनीक्षेपक यंत्रणा ठरविली. मंडपाचे साहित्य टेम्पोत भरुन ते अहिल्यानगरला जाण्यासाठी चिंतामणीनगर पुलाकडे येत होते. त्यांच्या पुढे मंडपाचे साहित्य भरलेला टेम्पो होता. रवींद्र व त्याच्या मित्र तीन दुचाकीवर होते. दत्त मंदिरजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने रवींद्रच्या दुचाकीला (क्र. एमएच १० बीएफ ८१०३) जोराची धडक दिली. रवींद्र पाठीमागे बसला होता, तर त्याचा मित्र भोराप्पा आमटे दुचाकी चालवित होता.
 
मोटारीची धडक बसल्याने रवींद्र व भोराप्पा दुचाकीवरुन उडून रस्त्याकडेला एका रिकाम्या प्लॉटमध्ये पडले. त्यानंतर धडक देणा-या मोटारीतून चार ते पाच संशयित उतरले. त्यांनी रवींद्रला टार्गेट करुन त्याच्यावत सत्तूरने हल्ला चढविला. हा प्रकार पाहून त्याचे पाचही मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने यातील चौघांनी पलायन केले; तर भोराप्पा आमटे त्यांच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही सत्तूरने हल्ला केला. रवींद्रच्या डोक्यात तीन घाव घातले. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी मोटारीतून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येचे वृत्त वा-यासारखे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
 
डोक्याचा चेंदामेंदा 
रवींद्रच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूचा चेंदामेंदा झाला होता. तीस सेंटीमीरटचा एक मोठा घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. अन्य दोन घाव दहा व सतरा सेंटीमीटरचे आहेत. गळ्यावर एकच लहान घाव आहे. मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. जखमी भोराप्पा आमटे यालाही उपचारार्थ दाखल केले आहे. त्याचा पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवून घेतला. 
 
‘नाजूक’ अन्...‘टिप’चा संशय
शहर पोलिसांच्या तपासात रात्री उशिरा मुख्य संशयित बाळू उर्फ बाळ्या शिंदे, म्हाळू  यांच्यासह चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथके विविध भागात रवाना करण्यात आले आहेत. २८ मार्चला गुंडाविरोधी पथकाने रवींद्रला अटक केली होती. तो सांगलीत आल्याची ‘टिप’ पथकाला बाळू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला होता. यातून या दोघांत जोरदार वादही झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच बाळूने साथीदारांच्या मदतीने रवींद्रवर पाळत ठेवून खून केल्याचा संशय आहे. तसेच या खुनामागे ‘नाजूक’ कारणही असण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टिने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. परंतु रात्री उशिरापर्यंत ठोस कोणतेही कारण पुढे आले नव्हते.