शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तडीपार गुंडाची निर्घृण हत्या

By admin | Updated: April 30, 2017 22:02 IST

सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 30 - सहा महिन्यापूर्वी तडीपार करण्यात आलेल्या रवींद्र माने (वय ३३, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या गुंडाचा पाठलाग करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. माधवनगर रस्त्यावरील कलानगर येथील दत्त मंदिराजवळ रविवारी भरदिवसा अडीच वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने डोके ठेचल्याने रवींद्र काहीक्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा मित्र भोराप्पा शिवाजी आमटे (२४, अहिल्यानगर) याच्यावरही संशयितांनी हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत.
 
मारामारी, दहशत माजविणे असे दोन गुन्हे रवींद्रविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी त्याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिका-यांना सादर केला होता. प्रांताधिका-यांनी त्याला सहा महिन्यापूर्वी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. २८ मार्च २०१७ रोजी तो पुन्हा शहरात आश्रयाला आला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला पकडले होते. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला पुन्हा सांगली जिल्ह्यातून बाहेर सोडले होते. गुढीपाडव्यालाही तो गुढी उभा करण्यासाठी घरी आला होता. पण पुन्हा तो लगेच निघून गेला होता. रविवारी त्याचा भाऊ राहुल याचा वाढदिवस होता. यानिमित्त भावाची अहिल्यानगरमध्ये पोस्टर लावण्यात आली होती. वाढदिवस मोठा साजरा करायचा असल्याने रवींद्र सकाळी अकरा वाजता आला होता. 
 
भावाच्या वाढदिवसाला मंडप उभा करण्यासाठी रवींद्र दुपारी एक वाजता पाच मित्रांसोबत घेऊन साखर कारखान्यावरील कामगार भवनमध्ये गेला होता. तिथे तो मंडप ठरविणार होता. मात्र मंडप मालकाने मंडप शिल्लक नसल्याचे सांगितले. तेथून तो मित्रांना घेऊन जुना बुधगावरस्तामार्गे कलानगर येथील माळी मंडप यांच्याकडे गेला होता. तिथे त्यांना मंडप, डेकोरेशन व ध्वनीक्षेपक यंत्रणा ठरविली. मंडपाचे साहित्य टेम्पोत भरुन ते अहिल्यानगरला जाण्यासाठी चिंतामणीनगर पुलाकडे येत होते. त्यांच्या पुढे मंडपाचे साहित्य भरलेला टेम्पो होता. रवींद्र व त्याच्या मित्र तीन दुचाकीवर होते. दत्त मंदिरजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने रवींद्रच्या दुचाकीला (क्र. एमएच १० बीएफ ८१०३) जोराची धडक दिली. रवींद्र पाठीमागे बसला होता, तर त्याचा मित्र भोराप्पा आमटे दुचाकी चालवित होता.
 
मोटारीची धडक बसल्याने रवींद्र व भोराप्पा दुचाकीवरुन उडून रस्त्याकडेला एका रिकाम्या प्लॉटमध्ये पडले. त्यानंतर धडक देणा-या मोटारीतून चार ते पाच संशयित उतरले. त्यांनी रवींद्रला टार्गेट करुन त्याच्यावत सत्तूरने हल्ला चढविला. हा प्रकार पाहून त्याचे पाचही मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने यातील चौघांनी पलायन केले; तर भोराप्पा आमटे त्यांच्या तावडीत सापडला. त्याच्यावरही सत्तूरने हल्ला केला. रवींद्रच्या डोक्यात तीन घाव घातले. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी मोटारीतून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येचे वृत्त वा-यासारखे पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
 
डोक्याचा चेंदामेंदा 
रवींद्रच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूचा चेंदामेंदा झाला होता. तीस सेंटीमीरटचा एक मोठा घाव बसल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. अन्य दोन घाव दहा व सतरा सेंटीमीटरचे आहेत. गळ्यावर एकच लहान घाव आहे. मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. जखमी भोराप्पा आमटे यालाही उपचारार्थ दाखल केले आहे. त्याचा पोलिसांनी रात्री उशिरा जबाब नोंदवून घेतला. 
 
‘नाजूक’ अन्...‘टिप’चा संशय
शहर पोलिसांच्या तपासात रात्री उशिरा मुख्य संशयित बाळू उर्फ बाळ्या शिंदे, म्हाळू  यांच्यासह चार हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण व गुंडाविरोधी पथके विविध भागात रवाना करण्यात आले आहेत. २८ मार्चला गुंडाविरोधी पथकाने रवींद्रला अटक केली होती. तो सांगलीत आल्याची ‘टिप’ पथकाला बाळू शिंदे याने दिल्याचा संशय रवींद्रला होता. यातून या दोघांत जोरदार वादही झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच बाळूने साथीदारांच्या मदतीने रवींद्रवर पाळत ठेवून खून केल्याचा संशय आहे. तसेच या खुनामागे ‘नाजूक’ कारणही असण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टिने तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. परंतु रात्री उशिरापर्यंत ठोस कोणतेही कारण पुढे आले नव्हते.