शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

शहरातील टँकरच्या मागणीत दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:39 IST

शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली

पुणे : शहरामध्ये सोसायट्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात न उतरता कागदावरच राहिली असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा मोठ्या सोसायट्या तसेच वस्ती भागाला अपुरा पडू लागला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी शहरातील पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुंबईमध्ये कालवा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत शहराला दररोज १३५० एमएलडी पाणी देऊन दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र १३५० एमएलडीइतक्या पाण्यामध्ये संपूर्ण शहराला दोन वेळा पाणी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून त्याच वेळी स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. केवळ पेठांचा काही भाग वगळता इतरत्र एक वेळच पाणी दिले जात आहे. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. सोसायट्यांबरोबरच मोठे हॉटेल, आयटी कंपन्या, मॉल, हॉस्टेल यांच्याकडून टँकरची मागणी वाढली आहे. महापालिकेच्या जलकेंद्रातून पाणी उचलणाऱ्या टँकरचालकांनी सोसायट्या व वस्ती भागाला प्राधान्याने पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात या व्यावसायिक कारणासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. वडगावशेरी, चंदननगर, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, बावधन, बाणेर, पाषाण आदी भागांमधील सोसायट्या व वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर रस्ता, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी आदी भागाला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येत आहे. मार्च २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र शेतकऱ्यांचे पुनर्वसन या प्रश्नावरून भामा आसखेड पाइपलाइनचे काम रखडले आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी या भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.चार जलकेंद्रांवर टँकर भरणामहापालिकेच्या पर्वती, चतु:शृंगी, वडगावशेरी, रामटेकडी, पद्मावती आदी भागाला ४ जलकेंद्रांवरून टँकरचालकांना पाणी उपलबध करून दिले. महापालिकेकडून एका टँकरच्या पाण्यासाठी ४५० रुपये शुल्क आकारले जाते. टँकरचालकांकडून १२०० ते १४०० रुपयांमध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. महापालिकेव्यतिरिक्त २०० खासगी बोअर, विहीरमालकांकडून टँकरसाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांच्याकडून १२५ ते १५० रुपये एका टँकरमागे घेतले जातात.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते, त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वाढतात. मात्र धरणसाठ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो आहे. जानेवारी महिन्यापर्यंत शहरातून प्रतिदिवस सरासरी १६० टँकर घेण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात ही संख्या २१० वर पोहोचली, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ३३५ टँकर दररोज लागतात. टॅँकर चालकांनी मनमानी पद्धतीने पाण्याची विक्री सुरू केली असल्याच्या तक्रारी आहेत.>मोठ्या हॉटेलकडून सर्वाधिक मागणीशहरातील फाइव्ह स्टार, थ्री स्टार हॉटेलना नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. उन्हाळा सुरू होताच त्यांच्याकडून पाण्याच्या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर मॉल्स, हॉस्टेल, आयटी कंपन्या यांनाही टँक रची आवश्यकता भासत आहे.