शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

हरभरा व कडधान्याला आधारभाव मिळावा, किसान सभेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:20 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालानुसार रब्बी हंगामात आतापर्यंत १६९ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांचा पेरा झाला आहे. एकूण पे-यापैकी तब्बल १०७ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला आहे.

मुंबई : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालानुसार रब्बी हंगामात आतापर्यंत १६९ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांचा पेरा झाला आहे. एकूण पे-यापैकी तब्बल १०७ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला आहे. एकूण कडधान्य पेऱ्यात हरभरा पिकाच्या पेऱ्याचा वाटा ६३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या हरभरा पिकाच्या पेऱ्यात ८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण कडधान्य पिकाच्या पेऱ्यातही वाढ नोंदविण्यात आली आहे. हरभरा व कडधान्याचे देशभरातील उत्पादन त्यामुळे वाढणार आहे. उत्पादन वाढले की शेतीमालाचे भाव खाली येतात. परिणामी शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले आधारभाव मिळत नाहीत. आधारभावा बाबतचा हा अनुभव पहाता शेतकऱ्यांना हरभरा व कडधान्य पिकांना आधारभाव मिळावे यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची  मागणी किसान सभेने केली आहे. 

देशभरात या वर्षी हरभरा पिकाचे १०७ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १० लाख टनांनी अधिक असणार आहे. देशांतर्गत हरभरा उत्पादनाची आवश्यकता पाहता यानुसार २० लाख टन हरभऱ्याचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. इतर कडधान्याच्या उत्पादनातही मागील हंगामापेक्षा वाढ होणे अपेक्षित आहे. वाढते अपेक्षित उत्पादन पाहता केंद्र सरकारने हरभऱ्याच्या आयात शुल्कात ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशांतर्गत हरभऱ्याची गरज व होणारे उत्पादन पाहता केवळ आयात शुल्कात वाढ करून हरभरा पिकाच्या आधारभावाचा प्रश्न सोडविता येणार नाही. वाढविलेल्या आयात शुल्कामुळे हरभऱ्याच्या वायदे बाजारात केवळ १.५ टक्के इतकी अत्यल्प सुधारणा होऊन भाव ३८७० रुपयापर्यंत पोहचले आहेत. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यावर भाव आणखी खाली जाणार हे उघड आहे. हरभऱ्याला किमान ४५०० रुपये भाव मिळावा यासाठी म्हणूनच अधिक हस्तक्षेप व आवकपूर्व सरकारी खरेदीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

देशातील निम्म्याहून अधिक जनता प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार प्रत्येक व्यक्तीने दररोज वजनानुसार प्रतिकिलो किमान ०.८ ते १ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. यानुसार ५० किलो वजनाच्या व्यक्तीने किमान ५० ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. भारतीयांना मात्र दररोज केवळ २४ ग्रॅम इतकेच प्रथिने मिळत असल्याचे आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. भारतीय जनतेची प्रथिनांची ही कमतरता हरभरा व इतर कडधान्याच्या उपलब्धतेतून पूर्ण करणे शक्य आहे. बालक व विद्यार्थ्यांमधील प्रथिनांचे कुपोषण रोखण्यासाठी नीती आयोगाने त्यामुळेच शालेय पोषण आहारात कडधान्याचा समावेश करण्याची शिफारस  केली आहे.

अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण मिळावे व भारतीय जनतेचे प्रथिनांच्या अभावाने होणारे कुपोषण रोखावे यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. गरीब कुटुंबाना यासाठी रेशनद्वारे अल्पदरात हरभरा व कडधान्य उपलब्ध करून  दया, शालेय पोषण आहारात कडधान्याचा समावेश करा व यासाठी आवकपूर्व नियोजन करून सरकारी खरेदीची पुरेशी तयारी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा करत आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र