शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

हरभरा व कडधान्याला आधारभाव मिळावा, किसान सभेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:20 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालानुसार रब्बी हंगामात आतापर्यंत १६९ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांचा पेरा झाला आहे. एकूण पे-यापैकी तब्बल १०७ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला आहे.

मुंबई : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पेरणी अहवालानुसार रब्बी हंगामात आतापर्यंत १६९ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांचा पेरा झाला आहे. एकूण पे-यापैकी तब्बल १०७ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला आहे. एकूण कडधान्य पेऱ्यात हरभरा पिकाच्या पेऱ्याचा वाटा ६३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकट्या हरभरा पिकाच्या पेऱ्यात ८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण कडधान्य पिकाच्या पेऱ्यातही वाढ नोंदविण्यात आली आहे. हरभरा व कडधान्याचे देशभरातील उत्पादन त्यामुळे वाढणार आहे. उत्पादन वाढले की शेतीमालाचे भाव खाली येतात. परिणामी शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले आधारभाव मिळत नाहीत. आधारभावा बाबतचा हा अनुभव पहाता शेतकऱ्यांना हरभरा व कडधान्य पिकांना आधारभाव मिळावे यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची  मागणी किसान सभेने केली आहे. 

देशभरात या वर्षी हरभरा पिकाचे १०७ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १० लाख टनांनी अधिक असणार आहे. देशांतर्गत हरभरा उत्पादनाची आवश्यकता पाहता यानुसार २० लाख टन हरभऱ्याचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. इतर कडधान्याच्या उत्पादनातही मागील हंगामापेक्षा वाढ होणे अपेक्षित आहे. वाढते अपेक्षित उत्पादन पाहता केंद्र सरकारने हरभऱ्याच्या आयात शुल्कात ४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशांतर्गत हरभऱ्याची गरज व होणारे उत्पादन पाहता केवळ आयात शुल्कात वाढ करून हरभरा पिकाच्या आधारभावाचा प्रश्न सोडविता येणार नाही. वाढविलेल्या आयात शुल्कामुळे हरभऱ्याच्या वायदे बाजारात केवळ १.५ टक्के इतकी अत्यल्प सुधारणा होऊन भाव ३८७० रुपयापर्यंत पोहचले आहेत. रब्बी हंगामातील हरभरा बाजारात आल्यावर भाव आणखी खाली जाणार हे उघड आहे. हरभऱ्याला किमान ४५०० रुपये भाव मिळावा यासाठी म्हणूनच अधिक हस्तक्षेप व आवकपूर्व सरकारी खरेदीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

देशातील निम्म्याहून अधिक जनता प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार प्रत्येक व्यक्तीने दररोज वजनानुसार प्रतिकिलो किमान ०.८ ते १ ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. यानुसार ५० किलो वजनाच्या व्यक्तीने किमान ५० ग्रॅम प्रथिने घेणे आवश्यक आहे. भारतीयांना मात्र दररोज केवळ २४ ग्रॅम इतकेच प्रथिने मिळत असल्याचे आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. भारतीय जनतेची प्रथिनांची ही कमतरता हरभरा व इतर कडधान्याच्या उपलब्धतेतून पूर्ण करणे शक्य आहे. बालक व विद्यार्थ्यांमधील प्रथिनांचे कुपोषण रोखण्यासाठी नीती आयोगाने त्यामुळेच शालेय पोषण आहारात कडधान्याचा समावेश करण्याची शिफारस  केली आहे.

अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण मिळावे व भारतीय जनतेचे प्रथिनांच्या अभावाने होणारे कुपोषण रोखावे यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. गरीब कुटुंबाना यासाठी रेशनद्वारे अल्पदरात हरभरा व कडधान्य उपलब्ध करून  दया, शालेय पोषण आहारात कडधान्याचा समावेश करा व यासाठी आवकपूर्व नियोजन करून सरकारी खरेदीची पुरेशी तयारी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा करत आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र