शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

जामदरा येथील शेतक-यांना कृषी विभाग देणार दिलासा!

By admin | Updated: March 14, 2016 02:07 IST

खरीप हंगामावर बहिष्कार टाकण्या-या जामदारा ग्रामस्थांची भेट दिली.

वाशिम: गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे चक्क खरीप हंगामावरच बहिष्कार टाकणार्‍या जामदरा गाववासीयांच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी समस्या जाणून घेतल्या असून, त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. जामदरा येथील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा या गावातील शेतकर्‍यांनी दुष्काळाने त्रस्त झाल्याने यावर्षीच्या आगामी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकला. दरवर्षीच शेतात लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करायचा आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे होत असलेल्या अल्प उत्पन्नाने शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच राहत आहे. शेतकर्‍यांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने या गावात जावून शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. मानोरा तालुका कृषी अधिकार्‍यांनी त्यांच्या चमूसह गावात जावून गावातील शेतीची पाहणी केली, तसेच शेतकर्‍यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांनी का असा टोकाचा निर्णय घेतला, याची माहिती जाणून घेतली. याचा अहवाल तयार करण्यात आला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. या गावातील शेतकर्‍यांनी दरवर्षीच कमी उत्पन्न होत असल्याने तोट्यात शेती करण्याऐवजी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले, की त्यानंतर गावातील पीक पद्धती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांशी बोलून त्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन करण्यात येईल. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गावकर्‍यांनी पीक पद्धतीत बदल करून उत्पादन घेण्याची गरज आहे.