शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवा

By admin | Updated: February 19, 2016 03:19 IST

अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याची कारवाई संथ गतीने सुरू असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवण्याची मुदत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना दिली आहे.

मुंबई : अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याची कारवाई संथ गतीने सुरू असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे आॅगस्ट २०१६पर्यंत हटवण्याची मुदत राज्य सरकार आणि महानगरपालिकांना दिली आहे.अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २००९मध्ये सर्व राज्यांना आदेश दिला. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याने सरकारला त्यावर तातडीने पावले उचलण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या वर्षी खंडपीठाने सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्यासाठी राज्य सरकार व राज्यातील सर्व महापालिकांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत मे महिन्यात संपत आहे. मात्र राज्य सरकारची कारवाईची गती पाहता खंडपीठाने आॅगस्ट २०१६पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ‘८८१ धार्मिकस्थळे अनधिकृत असून, आतापर्यंत ४१ बांधकामे भुईसपाट करण्यात आली. ११ बांधकामे जानेवारीत हटवण्यात आली. ८८१पैकी ८६२ बेकायदेशीर धार्मिकस्थळे महापालिकांच्या हद्दीत येतात. तर एकट्या मुंबईत ४८२ अशा प्रकारची बांधकामे आहेत. आॅगस्टपर्यंत सर्व बांधकामे हटवण्यात येतील,’ असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. तर मुंबई महापालिकेतर्फे ‘आतापर्यंत ४ धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित ४७८ धार्मिकस्थळे आॅगस्टपर्यंत पाडण्यात येतील; त्याशिवाय २२१ बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. २०७ धार्मिकस्थळे नियमित करण्यात आली आहेत. १४ जणांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे आणि ९ धार्मिकस्थळे स्थलांतरित करण्यात येतील,’ अशी माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)