शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

विलंबाच्या रिडिंगमुळे ग्राहकांना फटका

By admin | Updated: May 20, 2016 02:33 IST

वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे

पिंपरी : वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सांगवी विभागातील महावितरणच्या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना बसला असून, यास कारणीभूत असणाऱ्या बिलांचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून नागरिकांचे पैसे परत करावेत, अशी मागणी होत आहे. महावितरणतर्फे अनेक भागांत वेळेवर वीज बिलवाटप होत नाही. तसेच, मीटर रिडिंग मुदतीनंतर घेतले जाते. वीजबचतीच्या अनेक उपाययोजना करूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा रिडिंग घेतल्याने दुप्पट ते तिप्पट रकमेचे बिल भरावे लागत आहे. या महिन्यात आलेली बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे झाले आहेत. याबाबत ‘वाढीव बिलांमुळे नागरिकांना शॉक’ हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. नियमित योग्य प्रमाणात वापर असूनही केवळ उशिरा रिडिंग घेतल्याने नागरिकांना दुप्पट ते तिप्पट दराच्या वाढीव बिलाचा भार पेलावा लागतो. बिल मुदतीनंतर मिळाले किंवा मिळालेच नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यास दखल घेतली जात नाही. महावितरणच्या आॅनलाइन संकेतस्थळावर तपासा, मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, कॉल सेंटरशी संपर्क साधा, अशी उत्तरे नागरिकांना देण्यात येतात. याबाबचे वृत्त प्रकाशित केल्यानंतरही अधिकारी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून बिलिंगचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे. वीज वापराचा स्लॅब ठरवून दिला आहे. मात्र, मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या दहा तारखेच्या आत रिडिंग घेणे अपेक्षित असताना दहा ते बारा दिवस उशिराने रिडिंग घेतले. त्यामुळे बिल दुप्पट आले आहे. बिलिंगचे काम खासगी ठेकेदाराकडे दिले आहे. त्यांच्यावर अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. वाढीव बिले रद्द करून नवीन बिले द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सांगवी विभागातील वाढीव रिडिंगची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. दोन महिन्यांची तुलना केली असता, ही वाढ ४० ते ५० टक्के असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)