शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

परवडणाऱ्या घरांची व्याख्या स्पष्ट करावी

By admin | Updated: April 27, 2015 04:06 IST

मुंबई शहर आणि उपनगरात बांधण्यात आलेल्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे यातील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत;

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बांधण्यात आलेल्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे यातील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत; तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला राहण्यासाठी हक्काचे घर नाही. अशा परिस्थितीत सरकार सर्वसामान्यांना केवळ परवडणारी घरे बांधून देऊ, असे आश्वासन देत आहे. सरकारने प्रथमत: परवडणाऱ्या घरांची व्याख्या स्पष्ट करावी, असे ठाम मत गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी मांडले.घर हक्क आंदोलनाच्या वतीने करिरोड येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित मेळाव्याला संबोधित करताना दत्ता इस्वलकर बोलत होते. या वेळी विश्वास उटगी, श्वेता दामले या मान्यवरांसह सुमारे २ हजार नागरिक उपस्थित होते.दत्ता इस्वलकर म्हणाले की, आजघडीला मुंबईमध्ये डबेवाले, मोलकरणी, कामगार, टॅक्सी-रिक्षा चालक आणि फेरीवाले हा वर्ग सर्वसामान्य स्तरातील आहे; येथे राबविल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील २० टक्के घरे सर्वसामान्यांसाठी असतील, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र हे चुकीचे आहे. कारण ज्या लोकांना घरांची गरज आहे अशा लोकांचे शहरातील प्रमाण ८० टक्के आहे. मग त्या वर्गाला २० टक्के घरे कशी पुरणार? उलटपक्षी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सर्वसामान्यांना ८० टक्के घरे दिली पाहिजेत, असे आमचे म्हणणे आहे. विशेषत: सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधली जात आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र ही परवडणारी घरे श्रीमंतांसाठी की गरिबांसाठी हे सरकार स्पष्ट करीत नाही. सरकारने आमच्या भूमिकेवर १५ आॅगस्टपर्यंत मत मांडावे, असे घर हक्क आंदोलनाने म्हटले आहे. जर सरकारने परवडणाऱ्या घरांबाबत आपली व्याख्या स्पष्ट केली नाही, तर सध्या मुंबईत विक्रीविना पडून असलेल्या घरांचा ताबा आंदोलनाच्या वतीने घेण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)