शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

पाच जिल्ह्यांत १८०८ गुन्ह्यांची घट - विश्वास नांगरे-पाटील

By admin | Updated: January 20, 2017 19:50 IST

कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 -  कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता गंभीर गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गर्दी-मारामारी, बलात्कार, विनयभंग, दुखापत असे सुमारे २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
नांगरे-पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या सधन भाग असल्याने येथील स्थानिक गुन्हेगारांबरोबरच शेजारील राज्यांतील गुन्हेगारांचे आव्हान पोलिसांसमोर होते. आपल्या अधिकाराखालील पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन अशा गुन्हेगारांबाबत कायद्याने दिलेले अधिकार वापरण्याकरीता प्रोत्साहित करून पाठपुरावा केला. त्यामध्ये मोक्कांतर्गत एकूण २६ कारवाया करून १९६ आरोपींविरुद्ध कारवाई केली तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत १८ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत ‘कलम ५५’ नुसार ४०, कलम ५६-२१६, कलम ५७-११२ कारवाया करत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पुणे ग्रामीणमधील अट्टल गुन्हेगार शाम दाभाडे व त्याच्या साथीदारांना पोलिस चकमकीत मारल्याने तिथे आता शांतता आहे. यावर्षी १५२ फरार व ४१३ पाहिजे असलेले आरोपी पकडले आहेत. गुन्हेगारांकडे असणारी शस्त्रे असे एकूण ८६ गुन्हे दाखल करून परदेशी-देशी बनावटीची पिस्टल ५१, रिव्हॉल्व्हर १०, गावठी कट्टा १०, बंदूक ५, काडतुसे १२४ जप्त केली आहेत. शस्त्र पुरवठा करणा-यांवरही कारवाई केली आहे. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांत २०१६ मध्ये २६ हजार ८४२ गुन्हे दाखल असून गतवर्षीची तुलना करता १८०८ गुन्ह्यांची घट झाली आहे. तपासाची योग्य दिशा ठरवून तपासी अंमलदारांना वरिष्ठ अधिका-यांतर्फे मार्गदर्शन केल्याने न्यायालयात चालणा-या खटल्यांमध्ये गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण ४१ टक्के आहे तसेच न्यायालयाकडून समन्स बजावणीचे प्रमाण ९० व वॉरंटचे प्रमाण ८२ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे (कोल्हापूर), दत्तात्रय शिंदे (सांगली), संदीप पाटील (सातारा), वीरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण), अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (पुणे ग्रामीण) हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
.............................
गुन्हेगारांचे आदान-प्रदान 
गुन्हेगारांवर मानसिक दबाव ठेवणे, त्यांची माहिती सर्व पोलिस ठाण्यांना व्हावी, याकरिता गुन्हेगार आदान-प्रदान योजना चालू केली आहे. परिस्थितीमुळे काही तरुण गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना पुनर्वसनासाठी समुपदेशन होऊन समाजामध्ये चांगले जीवन जगता यावे यासाठी ‘आरोपी दत्तक योजना’ सुरू केली आहे. त्यामध्ये ‘एका पोलिस कर्मचाºयास एक आरोपी’ अशी दत्तक योजना राबविली आहे. 
-------------------------------
१००८ ग्रामपंचायतींचे ठराव
अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. यावर्षी २३७३ गुन्हे दाखल करून गुन्ह्यांच्या मुळाशी असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली आहे. हे धंदे बंद करण्यासाठी परिक्षेत्रातील १००८ ग्रामपंचायतींनी ठराव सादर केले आहेत. 
---------------------------------
मोक्का लावलेल्या टोळ्या : (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - एस. टी. ऊर्फ स्वप्निल तहसीलदार (१२), अमोल अशोक माळी (८), राजवर्धन पाटील (१०), सांगली - एम. डी. ऊर्फ महंमद नदाफ (८), प्रशांत पवार (१३), विजय शिंदे (५), मधुकर वाघमोडे (६), सातारा - योगेश अहिवळे (११), रॉयल सिक्वेरा (६), सोलापूर  - मनिष काळे (३), पुणे - शाम दाभाडे (१०), सचिन इथापे (१०), अविनाश भोसले (७), गणेश अगरवाल (६). 
----------------------------
हद्दपार प्रमुख गुन्हेगार टोळ्या - (कंसात आरोपी संख्या)
कोल्हापूर - बबन लाला कवाळे (४), सलीम यासीन मुल्ला (६), शंकर भास्कर (७), शंकर पवार (५), सांगली - रणजित पाटील (५), सतीश बाळाराम जाधव (२), सतीश पवार (४),सातारा - समीर कच्छी (५), जब्बार पठाण (६), यासीन शेख (६), सोलापूर - रूपला किसन राठोड (६), पुणे - मंगेश देशमुख (३), नीलेश कुर्लप (११), पप्पू राजापूरे (७). 
---------------------------
परिक्षेत्रातील गुन्ह्यांची आकडेवारी (२०१६)
खून ३७५, खुनाचा प्रयत्न ३०७, दरोडा ८६, जबरी चोरी  ५०२, घरफोडी १५७३, चोरी ६०१४, ठकबाजी ८१९, गर्दी-मारामारी १७८०, दुखापत ३८६९, बलात्कार ५४६, विनयभंग १३८८, सार्वजनिक ठिकाणी हल्ला ३८५ यासह इतर.