शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

संरक्षण उद्योगांचे खासगीकरण नाही

By admin | Updated: April 22, 2016 00:59 IST

देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.

खडकी: देशातील कोणत्याही दारूगोळा कारखान्यासह संरक्षण उद्योगांचे खासगीकरण करणार नाही. उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने नवीन भरतीचाही विचार केला जाईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. खडकीतील आलेगावकर विद्यालयात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या वतीने आयोजित केलेल्या १७व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बैजनाथ रॉय, प्रतिरक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र तिवारी, प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ, उपाध्यक्ष के. एन. शर्मा, केंद्रीय कर्मचारी परिसंघाचे सचिव एम. पी. सिंह, सरचिटणीस साधू सिंह, उपाध्यक्ष मोहन राव, अरुण सूर्यवंशी, महामंत्री एम. पी. सिंग, एस. एन. पटवे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन आदी उपस्थित होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात अध्यक्ष बैजनाथ रॉय यांनी संरक्षण कामगारांचे प्रश्न मांडले. दारूगोळा कारखाने, संरक्षण उद्योगाचे खासगीकरण, वारसांना नोकरी, अ‍ॅप्रेंटिसशिप कामगारांना नोकरीत प्राधान्य, निर्धारित बोनस, नवीन कामगारांना ग्रॅच्युएटी पेन्शन द्या, अशा मागण्या केल्या. त्याची उत्तरे संरक्षणमंत्र्यांनी दिली. संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले, ‘‘दारूगोळा कारखान्यांनी चौदा हजार कोटींची उलाढाल पूर्ण केली आहे. उत्पादन क्षमता चांगली आहे. ही आपल्या देशाची आणि संरक्षण विभागाची ताकद आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला बळ मिळेल. उत्पादन क्षमता चांगली झाली आहे. आता आपल्याला उत्पादनात रिजेक्शन कमी, आपली उत्पादने एक्सपोर्ट कशी होतील, या दृष्टीने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. भरती प्रक्रिया सेंट्रलाइज करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आऊटसोर्सिंग, कंत्राटी कामगार हे अडचणीचे विषय आहे. त्याचबरोबर अ‍ॅप्रेंटिसशिप कामगारांचा प्रश्नही सकारात्मकरीत्या सोडविला जाईल. सर्वांना खासगीकरणाची चिंता आहे. संरक्षण उद्योगांचे खासगीकरण केले जाणार नाही. त्यामुळे कामगारांनी निश्चिंत राहावे. सातवा वेतन आयोग आदी प्रश्नांचीही चिंता करू नये. ’’संरक्षण मंत्री यांनी खासगीकरण होणार नाही, असे जाहीर करताच उपस्थितांमधून जोरात टाळ्यांची दाद देण्यात आली. रॉय यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी संरक्षण कामगारांचे प्रश्न मांडले. तसेच संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण करू नये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. प्रशिक्षणार्थींना संरक्षण सेवेत रूजू करावेत, अश्या मागण्या केल्या. (वार्ताहर)