शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको

By admin | Updated: May 19, 2014 00:18 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली.

पुणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली. त्याचे पडसाद तत्काळ उमटले. कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. पुण्यातील विकास आराखडा, मेट्रो, पार्किंग नियमावली असे अनेक विषय मुख्यमंत्री चव्हाण यांनी मार्गी लावले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्व जनतेला त्यांची ओळख आहे. स्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. पराभव हा कोणा एकट्यामुळे होत नसतो, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले. देशभरातील मोदी लाटेमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचे एकट्या मुख्यमंत्र्यांवर खापर फोडणे योग्य होणार नाही. राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक सभा घेतल्या, तसेच त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. त्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, राजीनामा मागण्याच्या भूमिकेला कॉँग्रेसच्या इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)