शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर नको

By admin | Updated: May 19, 2014 00:18 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली.

पुणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी आत्मचिंतन बैठकीत रविवारी केली. त्याचे पडसाद तत्काळ उमटले. कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्यांवर पराभवाचे खापर फोडणे चुकीचे आहे. काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. पुण्यातील विकास आराखडा, मेट्रो, पार्किंग नियमावली असे अनेक विषय मुख्यमंत्री चव्हाण यांनी मार्गी लावले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्व जनतेला त्यांची ओळख आहे. स्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. पराभव हा कोणा एकट्यामुळे होत नसतो, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे आमदार विनायक निम्हण यांनी सांगितले. देशभरातील मोदी लाटेमुळे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचे एकट्या मुख्यमंत्र्यांवर खापर फोडणे योग्य होणार नाही. राज्यातील लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी अनेक सभा घेतल्या, तसेच त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. त्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, राजीनामा मागण्याच्या भूमिकेला कॉँग्रेसच्या इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)