शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

Deepali Chavan Suicide Case: रेड्डींचा बदलीला विरोध, म्हणतात... बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:51 IST

Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे.

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे. माझी कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. त्यामुळे पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवाच्या जोरावर त्यांची मुजोरी सुरू असल्याची चर्चा आहे.दीपाली यांच्या सुसाईड नोटनुसार रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई आहे. परिणामी वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांना अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बस्तान बसवलेल्या रेड्डी यांना बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, असे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले आहे.   

रेड्डी यांचा विदर्भातील कार्यकाळ रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर २०१७ मध्ये ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी रुजू झाले.  या प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे पद आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले.  आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता त्यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवाच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.  

बदलीला विरोध का?रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी यांनी भंग केला आहे. जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी ते बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पत्र अद्याप प्राप्त नाहीएम.एस. रेड्डी यांनी पाठविलेले पत्र अद्याप मला प्राप्त झालेले नाही. मात्र, रेड्डी यांचा कार्यभार अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासन आदेशाची कार्यवाही पूर्णत्वास आलेली आहे. रेड्डींनी पत्रात काय म्हटले, याबाबत शासनाला कळवले जाईल.-पी. साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) नागपूर 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग