शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Deepali Chavan Suicide Case: रेड्डींचा बदलीला विरोध, म्हणतात... बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 05:51 IST

Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे.

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे. माझी कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. त्यामुळे पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवाच्या जोरावर त्यांची मुजोरी सुरू असल्याची चर्चा आहे.दीपाली यांच्या सुसाईड नोटनुसार रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई आहे. परिणामी वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांना अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बस्तान बसवलेल्या रेड्डी यांना बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, असे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले आहे.   

रेड्डी यांचा विदर्भातील कार्यकाळ रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर २०१७ मध्ये ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी रुजू झाले.  या प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे पद आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले.  आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता त्यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवाच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.  

बदलीला विरोध का?रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी यांनी भंग केला आहे. जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी ते बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पत्र अद्याप प्राप्त नाहीएम.एस. रेड्डी यांनी पाठविलेले पत्र अद्याप मला प्राप्त झालेले नाही. मात्र, रेड्डी यांचा कार्यभार अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासन आदेशाची कार्यवाही पूर्णत्वास आलेली आहे. रेड्डींनी पत्रात काय म्हटले, याबाबत शासनाला कळवले जाईल.-पी. साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) नागपूर 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग