शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:18 IST

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. याच दरम्यान आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जयदीप आपटेला कोणी काम दिलं होतं? असा प्रश्न विचारला असता केसरकरांनी त्यावर उत्तर दिलं आहे. "एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, त्याकडे बघितलं पाहिजे. चूक, अपघात घडू शकतात, पण महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं ते नेव्हीच्या फ्लॅगवर अभिमानाने फडकतं" असं केसरकरांनी म्हटलं आहे. 

मालवणमध्ये नवीन पुतळा बसवण्यासाठीची प्रक्रिया कशी असेल याबाबतही दीपक केसरकर यांनी माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांनी मालवणमधील प्रकरणाबाबत तीन बैठका घेतल्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार उपस्थित होते, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जात आहे. भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, परिसराचा ही विकास केला जाणार आहे" असं केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

 "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे...", शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "मला इतकं दुखं होतंय की हे सांगताहेत ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभे आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज