शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar : मालवण प्रकरण : जयदीप आपटेला कोणी दिलं होतं काम?; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 14:18 IST

Deepak Kesarkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. याच दरम्यान आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जयदीप आपटेला कोणी काम दिलं होतं? असा प्रश्न विचारला असता केसरकरांनी त्यावर उत्तर दिलं आहे. "एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे बघताना या दृष्टीने बघता कामा नये. त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, त्याकडे बघितलं पाहिजे. चूक, अपघात घडू शकतात, पण महाराजांचे जे ब्रीदवाक्य होतं ते नेव्हीच्या फ्लॅगवर अभिमानाने फडकतं" असं केसरकरांनी म्हटलं आहे. 

मालवणमध्ये नवीन पुतळा बसवण्यासाठीची प्रक्रिया कशी असेल याबाबतही दीपक केसरकर यांनी माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांनी मालवणमधील प्रकरणाबाबत तीन बैठका घेतल्या. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार उपस्थित होते, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जात आहे. भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल, परिसराचा ही विकास केला जाणार आहे" असं केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 

 "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे...", शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "मला इतकं दुखं होतंय की हे सांगताहेत ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभे आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज