शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ज्वारी, बाजरी, ऊस, कांद्याची घटणार उत्पादकता; तापमानवाढीमुळे शेतीवर गंभीर परिणामांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:36 IST

प्राध्यापक तोडमल यांच्या मते भविष्यातील तापमान वाढ ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवरदेखील वाईट परिणाम करणार आहे.

मुंबई : अतिपर्जन्यवृष्टी आणि तापमान वाढ यामुळे शेती संकटाच्या छायेत आहे. राज्यात उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या वाढत्या घटनांमुळे अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहेत. राज्यातील हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे २०३३ नंतर ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ या सारख्या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होतील. प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे.

स्विझरलँडमधून जानेवारी २०१९मध्ये 'प्युअर अँड अप्लाइड जिओ फिजिक्स' या संशोधन मासिकात हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे परिणाम या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसच्या दरम्यान वार्षिक सरासरी तापमानामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने जाणवणारी आहे. प्रादेशिकदृष्ट्या विचार करता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत १ ते २.५ अंश सेल्सिअस इतकी तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे.

हा निष्कर्ष विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती या ठिकाणी कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी केलेल्या संशोधनातून मांडण्यात आला आहे. त्यानुसार पुढील पाच दशकांमध्ये जवळपास ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तापमान यामध्ये लक्षणीय बदल झालेले असणार आहेत.

प्राध्यापक तोडमल यांच्या मते भविष्यातील तापमान वाढ ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवरदेखील वाईट परिणाम करणार आहे. तसेच भविष्यातील उन्हाळे अधिक तीव्र असतील आणि हिवाळ्यातील थंडी कमी झालेली असेल. २०५० पर्यंत मोसमी पर्जन्यात सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये अनुभवलेल्या पूर परिस्थितीची पुनरावृत्ती राज्यभरात होईल.

सदर संशोधन महाराष्ट्र राज्यातील भविष्यातील तापमान आणि पर्जन्याचा आकृतिबंध सांगणारे असून त्यातून हे बदल मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न आणि पाणी या घटकांना प्रभावित करणार आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.  - नमन गुप्ता, हवामानविषयक माजी सल्लागार, महाराष्ट्र सरकार