शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 04:20 IST

आतापर्यंत राज्यभरात सुमारे ११ लाख ७५ हजार रुग्णांची तपासणी केली. २१ हजार रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या दिल्या.

मुंबई : राज्यामध्ये स्वाइन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे होणाºया मृत्यूच्या प्रमाणात मे महिन्यापासून घट झाली आहे. गेल्या सुमारे २५ दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून रुग्णसंख्येतदेखील घट झाली आहे. राज्यात पुणे पालिकेच्या क्षेत्रात केवळ दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आरोग्य विभागामार्फत जानेवारी २०१९ पासून मे अखेरपर्यंत ९ हजार व्यक्तींना लसीकरण केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. विभागामार्फत स्वाइन फ्लूसदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले आहे. आतापर्यंत राज्यभरात सुमारे ११ लाख ७५ हजार रुग्णांची तपासणी केली. २१ हजार रुग्णांना ऑसेलटॅमिविर गोळ्या दिल्या. सध्या १०५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. जानेवारी ते मे अखेर स्वाइन फ्लूमुळे १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.२५ दिवसांत एकही मृत्यू नाहीगेल्या २५ दिवसांत एकही मृत्यू झालेला नाही. जानेवारीमध्ये ११७ रुग्ण आढळून आले तर या संपूर्ण महिनाभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये ४०१ रुग्ण आढळून आले तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये ५८५ रुग्ण आढळून आले तर ६३ रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये ३२८ रुग्ण आढळून आले तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. मे महिन्यात १८८ रुग्ण आढळले त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला. १० मेनंतर राज्यात स्वाइन फ्लूमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू