शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वाचायचं... की गळक्या नळासारखं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2023 10:30 IST

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचं वाचनाच्या बाबतीत अगदी असंच झालं आहे.

आनंद अवधानी, मुक्त पत्रकार आणि लेखक

नुकताच माझ्या मित्राच्या मुलाच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आहे. आम्ही सगळे एका पर्यटनस्थळी सहलीला गेलो होतो. तिथे सगळ्यांनी शीतपेयाच्या बाटल्या घेतल्या. माझ्या मित्राच्या शाळकरी मुलाच्या हातून ती बाटली निसटली आणि खळ्ळ असा आवाज करत फुटली. क्षणाचाही विलंब न लावता त्या छोट्या मुलाने दुकानदाराकडून दुसरी बाटली घेतली. या प्रकाराने माझा मित्र कमालीचा अस्वस्थ झाला. आपल्या मुलाला बाटली फुटल्याचं दुःख किंवा पश्चात्ताप क्षणभरही झाला नाही, याचा त्याला फार त्रास झाला.

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गाचं वाचनाच्या बाबतीत अगदी असंच झालं आहे. गेली काही वर्षं मराठी (इंग्रजीसुद्धा) वाचन कमी होतं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे पालकांचा बदललेला प्राधान्यक्रम हे महत्त्वाचं कारण आहे. महाराष्ट्रातल्या शहरी मध्यमवर्गाला सतत असं वाटतं की त्यांच्या मुलांना शाळेत भरपूर मार्क्स मिळावेत, तरच नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळतो, तरच भरपूर पगाराच्या पॅकेजची नोकरी मिळते. या भरपूर मार्क्स आणि भरपूर पगाराच्या पॅकेजच्या प्रवासामध्ये मराठी किंवा इंग्रजी वाचन ही स्टेशन्स लागतच नाहीत. त्यामुळे मुलं पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, विजय तेंडुलकर किंवा भालचंद्र नेमाडे वाचत नाहीत. त्याचप्रमाणे शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, मिल्टन किंवा पामुक वाचत नाहीत. मुख्य म्हणजे आपली मुलं वाचत नाही, याची जराही खंत पालकांना वाटत नाही.

वाचन कमी होत आहे याची जाणीव काहीजणांना निश्चितपणे आहे. पण, वाचनाशी संपर्क तुटत चालल्याने आपलं समाज म्हणून किती मोठं नुकसान होतं आहे, याचं भान अजून आलेलं नाही. वाचनाच्या अभावामुळे मेंदूमधला ठहराव संपतो आहे. कोणत्याही एका विषयाचा खोलवर विचार करण्याची मेंदूची क्षमता हरवत चालली आहे. ज्या मुलांचा जन्म मोबाइल फोननंतर झाला आहे, त्यांना या सगळ्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. भविष्यात त्यांनी करिअर म्हणून काहीही केलं तरी एखादा विषय मुळातून समजून घेण्याची मेंदूची क्षमता शाबूत राहणं गरजेचं ठरणार आहे. आज अमेरिका आणि अन्य प्रगत देशांत मोबाइलचा वापर कामापुरताच करून पुस्तकांचं वाचन वाढवण्यावर भर दिला जात आहे. भारतात मात्र नेमकं उलटं चालू आहे. मुलांनी ‘ग्लोबल सिटिझन’ व्हावं, अशी त्यांच्या पालकांची इच्छा आहे. पण ‘ग्लोबल सिटिझन’ होण्यासाठी आपल्या मुलांना वैश्विक स्पर्धेत उतरावं लागणार आहे, याचा अंदाज अजून भारतीय पालकांना आलेला नाही. तो येईल तेव्हा ते वाचनाविषयी इतके उदासीन राहणार नाहीत. आपली मुलं आणि आपण स्वत: काही वाचत नाही, याची खंत वाटणं ही या सगळ्याची पहिली पायरी असेल.

- आज बहुतांश घरांमध्ये सकाळी उठल्यावर घरातला प्रत्येक जण आपापले मोबाइल फोन उघडतो. त्यावर रात्रीतून आलेले व्हॉट्सॲप, इन्स्ट्राग्राम आणि तत्सम निरोप वाचतो.

-  गळक्या नळातून अखंड पाणी गळत राहावं तसे त्यातले मेसेज, व्हिडीओ एकामागोमाग एक पाझरतात. बघता बघता घड्याळाचा काटा किती पुढे सरकला हे लक्षातच येत नाही. मग ऑफिसला जाण्याची घाई.

- ऑफिसात काम करताना मध्येमध्ये व्हॉट्सॲपच्या खिडकीत डोकावायचं, फेसबुकवर चक्कर मारायची. असं करत दिवस संपला तरी रात्रीही उशाशी फोन असतोच. या सगळ्यात वाचन येतच नाही. मासिक किंवा पुस्तक दूरची गोष्ट झाली. साधं वर्तमानपत्रही येत नाही. अर्थातच या मंडळींना त्याचा संकोचही वाटत नाही.