शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्याबाबत उद्या निर्णय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 19, 2017 20:08 IST

राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सांगितले होते. पण भाजपाने दलित मतांवर डोळा ठेवून भाजपाने दलित उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

 आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा एकदा शरसंधान केले. 51 वर्षं जुना पक्ष आहे यावर विश्वास बसत नाही. शिवसेनेचे सर्व वर्धापन दिन पाहिलेत, तोच उत्साह आणि तीच जिद्द अजूनही पक्षात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. " राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. हीच शिवसेनेची ताकद आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले होते. पण दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून रामनाथ कोविंद यांचे नाव भाजपाने पुढे केले आहे. दलित मतांसाठी कोविंद यांचं नाव पुढे केलं असेल तर आम्हाला रस नाही. दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

-शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आतापर्यंत उत्साह कायम

-केवळ मतांचे राजकारण करणार असेल त्यात शिवसेना कधीच पडणार नाही

-  दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही

-हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते

-शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले

-शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी 

-वेड्या वाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरुन टाकणार असाल तर ते कागद मी फाडून टाकेन

 - शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर मोकळ्या मनानं आणि सढळ हातानं द्या 

-कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार

-मध्यावधीची पर्वा नाही, पण शेतकरी आत्महत्यांची चिंता वाटते