शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्याबाबत उद्या निर्णय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 19, 2017 20:08 IST

राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव सांगितले होते. पण भाजपाने दलित मतांवर डोळा ठेवून भाजपाने दलित उमेदवार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

 आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा एकदा शरसंधान केले. 51 वर्षं जुना पक्ष आहे यावर विश्वास बसत नाही. शिवसेनेचे सर्व वर्धापन दिन पाहिलेत, तोच उत्साह आणि तीच जिद्द अजूनही पक्षात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. " राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. हीच शिवसेनेची ताकद आहे. हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते, तर त्या नावावर सहमती होत नसेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले होते. पण दलित समाजाच्या मतांवर डोळा ठेवून रामनाथ कोविंद यांचे नाव भाजपाने पुढे केले आहे. दलित मतांसाठी कोविंद यांचं नाव पुढे केलं असेल तर आम्हाला रस नाही. दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. राष्ट्रपती निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

-शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आतापर्यंत उत्साह कायम

-केवळ मतांचे राजकारण करणार असेल त्यात शिवसेना कधीच पडणार नाही

-  दलित समाजाची मतं घेण्यासाठी जर दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही

-हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते

-शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून डॉ. स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले

-शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी 

-वेड्या वाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरुन टाकणार असाल तर ते कागद मी फाडून टाकेन

 - शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर मोकळ्या मनानं आणि सढळ हातानं द्या 

-कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात कानडी सरकार मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार

-मध्यावधीची पर्वा नाही, पण शेतकरी आत्महत्यांची चिंता वाटते