शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तोंडी परीक्षेच्या निर्णयाला तोंड फुटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:54 IST

भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा बंद करून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. मात्र या निर्णयाला सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी विरोध

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा बंद करून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. मात्र या निर्णयाला सर्वपक्षीय शिक्षक संघटनांनी विरोध केला असून या निर्णयामुळे दहावीच्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.सरकारने हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केली आहे. बोरनारे म्हणाले की, तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांचे वाचन, संभाषण, भाषण व श्रवण कौशल्य तपासले जातात व त्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात. सीबीएससी आणि विविध बोर्डाच्या परीक्षांमध्ये भाषा विषयांना अंतर्गत गुण दिले जातात. मग केवळ राज्य बोर्डातील विद्यार्थ्यांच्याच तोंडी परीक्षा का बंद केल्या जात आहेत, असा सवालही बोरनारे यांनी उपस्थित केला आहे.शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राज्य बोर्डाच्या शिक्षकांवर विश्वास नाही. त्यामुळे गुणांचा फुगवटा कमी करण्याच्या नावाखाली तावडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलचे माजी उपाध्यक्ष महादेव सुळे यांनीही शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. सुळे म्हणाले की, राज्य बोर्डाला एक नियम आणि इतर बोर्डांना दुसरा नियम असा भेदभाव करू नये. सरकारने हा निर्णय रद्द केला नाही, तर शिक्षकांना पालकांसोबत मिळून आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.