शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

हा ‘लोकमता’चाच निर्णय

By admin | Updated: June 13, 2015 00:51 IST

विनोद तावडे : नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर - दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. अशी परीक्षा घेण्याची सूचना ‘लोकमत’ने केली. ती रास्त आणि नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविणारी असल्याने राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ती अमलात आणली, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगितले.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो नापास विद्यार्थ्यांना होतो. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का? असा प्रश्न मंत्री विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात प्रस्तुत प्रतिनिधीने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का? याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.मंत्री किंवा सरकार आश्वासने देतात. बऱ्याचवेळा ती केवळ आश्वासनेच राहतात. निर्णय झालाच तर तो खूप उशिराने होतो, असा एकूण सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, मंत्री तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच वर्षापासून अशी फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतले आणि राज्यातील लाखांवर नापास विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून दिली. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकार संवेदनशीलतावडे यांच्या या गतिमान निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्य सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अतिशय संवेदनशील आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याबाबत सूचना विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याने तातडीने अमलात आणली. जनहिताची एखादी सूचना आली आणि ती योग्य वाटली तर सरकार तातडीने त्यावर कृती करून कार्यवाही करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.