शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

हा ‘लोकमता’चाच निर्णय

By admin | Updated: June 13, 2015 00:51 IST

विनोद तावडे : नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर - दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. अशी परीक्षा घेण्याची सूचना ‘लोकमत’ने केली. ती रास्त आणि नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविणारी असल्याने राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ती अमलात आणली, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगितले.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो नापास विद्यार्थ्यांना होतो. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का? असा प्रश्न मंत्री विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात प्रस्तुत प्रतिनिधीने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का? याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.मंत्री किंवा सरकार आश्वासने देतात. बऱ्याचवेळा ती केवळ आश्वासनेच राहतात. निर्णय झालाच तर तो खूप उशिराने होतो, असा एकूण सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, मंत्री तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच वर्षापासून अशी फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतले आणि राज्यातील लाखांवर नापास विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून दिली. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकार संवेदनशीलतावडे यांच्या या गतिमान निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्य सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अतिशय संवेदनशील आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याबाबत सूचना विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याने तातडीने अमलात आणली. जनहिताची एखादी सूचना आली आणि ती योग्य वाटली तर सरकार तातडीने त्यावर कृती करून कार्यवाही करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.