शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

हा ‘लोकमता’चाच निर्णय

By admin | Updated: June 13, 2015 00:51 IST

विनोद तावडे : नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

चंद्रकांत कित्तुरे - कोल्हापूर - दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. अशी परीक्षा घेण्याची सूचना ‘लोकमत’ने केली. ती रास्त आणि नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविणारी असल्याने राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ती अमलात आणली, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सांगितले.दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात गेल्या १४ वर्षांपासून पुरवणी परीक्षा घेतली जाते. तिचा फायदा दरवर्षी हजारो नापास विद्यार्थ्यांना होतो. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नाही. अशीच परीक्षा महाराष्ट्रातही घेण्याबाबत सरकार विचार करेल का? असा प्रश्न मंत्री विनोद तावडे यांना २२ मे रोजी कोल्हापुरात प्रस्तुत प्रतिनिधीने विचारला होता. त्यावर सूचना खूप चांगली आहे. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे, अशी परीक्षा घेणे शक्य आहे का? याचा अभ्यास करू आणि अशी परीक्षा घेण्याबाबत निश्चितपणे विचार करू, असे त्यांनी सांगितले होते. याचवेळी ‘लोकमत’ने कर्नाटकात होणारी पुरवणी परीक्षा आणि महाराष्ट्रात ती कशी आवश्यक आहे, हे सांगणारी वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याचेही तावडे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.मंत्री किंवा सरकार आश्वासने देतात. बऱ्याचवेळा ती केवळ आश्वासनेच राहतात. निर्णय झालाच तर तो खूप उशिराने होतो, असा एकूण सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र, मंत्री तावडे यांनी यासंदर्भात सूचना केल्यानंतर तातडीने शिक्षण विभागातील यंत्रणेला कामाला लावले आणि अवघ्या १५ दिवसांत म्हणजेच ८ जूनला महाराष्ट्रातही दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच वर्षापासून अशी फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घेतले आणि राज्यातील लाखांवर नापास विद्यार्थ्यांना याच शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्याची संधी उपलब्ध करून दिली. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकार संवेदनशीलतावडे यांच्या या गतिमान निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, राज्य सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अतिशय संवेदनशील आहे. नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्याबाबत सूचना विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याने तातडीने अमलात आणली. जनहिताची एखादी सूचना आली आणि ती योग्य वाटली तर सरकार तातडीने त्यावर कृती करून कार्यवाही करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.