शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
4
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
5
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
6
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
7
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
8
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
9
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
10
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
11
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
12
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
13
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
14
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
15
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
16
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
17
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
18
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
19
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
20
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी

युतीचा आज होणार फैसला

By admin | Updated: January 26, 2017 05:54 IST

शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या, दि.२६ ला सायंकाळी होणाऱ्या पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे.

मुंबई : शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या, दि.२६ ला सायंकाळी होणाऱ्या पक्षमेळाव्यात करण्याची शक्यता आहे. कालपर्यंत युतीसाठी अनुकूल असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वबळाच्या मूडमध्ये असल्याच्या वृत्ताने युतीचे भवितव्य अधिकच टांगणीला लागले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांचा मेळावा गुरुवारी सायंकाळी गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर होणार आहे. ‘आपण युतीबाबत २६ तारखेला सविस्तर बोलू,’ असे ठाकरे यांनी आधीच जाहीर केले असल्याने उद्याच्या त्यांच्या या मेळाव्यातील भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे कालपर्यंत, ‘युती झाली पाहिजे’, यासाठी आग्रही होते. तथापि, आता ते ‘युती नाही झाली तरी हरकत नाही’, अशा मूडमध्ये असल्याचे म्हटले जाते. युती करून लढलो तर भाजपाला शिवसेनेपेक्षा कमीच जागा मिळतील. त्यापेक्षा २२७ जागा लढून पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळविण्यासाठी प्रयत्न का करू नये, असा त्यांचा विचार असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. पहिल्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या तर भाजपाचा पहिला महापौर बसू शकेल, असा विचार आता प्रबळ (पान १ वरून) झाला आहे. मुख्यमंत्र्यांचा सध्याचा मूड हा निर्णयात बदलला तर युती होणार नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील युती करू नये, या मताचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे स्वबळावरच लढले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणाऱ्या मुंबईतील भाजपा नेत्यांना आज अचानक बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात उद्याच्या मेळाव्याआधी चर्चा होऊन काही मार्ग निघेल का याकडेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. युती व्हायचीच असेल तर भाजपाला ११४ जागांचा आग्रह सोडावा लागेल आणि शिवसेनेला साठ जागांवरून पुढे सरकावे लागणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये आज बोलणी झाली नाही. युतीबाबत ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे शिवसेनेचे नेते खा.अनिल देसाई म्हणाले. ‘युती करू नये’ या भूमिकेप्रत ठाकरे आले असून उद्या एखादा चमत्कारच युती वाचवू शकेल, असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी ११४ पेक्षा पाचपंचवीस कमी जागा स्वीकारुन युती केली तर भाजपात नाराजी पसरेल आणि १०० पेक्षा अधिक जागांवर ते ठाम राहिले तर शिवसेना युती करणार नाही. त्यापेक्षा स्वबळावर लढणेच योग्य राहील का या बाबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशिरापर्यंत भाजपाच्या मुंबईतील नेत्यांशी ‘वर्षा’वर चर्चा केल्याची माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)