शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

कर्जमाफी! परतफेड ३१ मार्च १८ पर्यंत!

By admin | Updated: July 1, 2017 02:46 IST

दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी ज्या शेतकऱ्यांकडे आहे. त्यांनी अधिकची रक्कम भरली तर दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे २८ जून रोजी निघालेल्या कर्जमाफीच्या शासकीय आदेशात नमूद करण्यात आले होते. तथापि, ही अधिकची रक्कम कधीपर्यंत भरता येईल, याची कोणतीही मुदत त्या आदेशात देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले की, या थकबाकीच्या परतफेडीची मुदत ही ३१ मार्च २०१८ असेल. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाने सरसकट माफ केले आहे. त्याचा फायदा ३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. दीड लाखावर कर्ज असलेल्या ८ लाख शेतकऱ्यांना अधिकची रक्कम भरताना तजविज करता येण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यादृष्टीनेच पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जाणकारांच्या मते या निर्णयाने जसा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसा कर्जमाफीच्या निर्णयाने आर्थिक बोजाखाली दबलेल्या सरकारवर एकाचवेळी दडपण येणार नाही. ३६ लाख शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देताना सरकारवर मोठा बोजा येईल. त्याचवेळी दीड लाखावरील थकबाकीदारांना दोन महिन्यांची मुदत दिली असती आणि त्या मुदतीत त्यांनी थकबाकी परत केली असती तर सरकारवर एकाचवेळी मोठा आर्थिक ताण पडला असता. ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत दिल्याने आता तसे होणार नाही. ‘त्या’ परतफेडीला मिळणार मुदतवाढ -नियमित कर्ज परतफेड केल्यास २५ हजार रुपये वा थकबाकीच्या २५ टक्के यापैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून ज्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यांना परतफेडीची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. ही मुदत जूनअखेर होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे शासन किमान एक महिन्याची मुदतवाढ देईल, अशी शक्यता आहे. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, या परतफेडीचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असे कर्जमाफीच्या आदेशात म्हटले होते. शेतकरी कर्जमाफीत घेणार जनतेच्या देणग्याराज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे, या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत असताना आता अशा देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्तींनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून ही रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणली जाईल.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये उऌकएऋ टकठकरळएफर ऋअफटएफ फएछकएऋ ऋवठऊ या नावाने ३६९७७०४४०८७ क्रमांकाचे खाते उघडण्यात आले आहे. या शाखेचा कोड ००३० आणि आयएफएससी कोड रइकठ ००००३०० असा आहे. या खात्यावर इच्छुक देणगीदारांना एनईएफटी अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.