शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

कर्जमाफी! परतफेड ३१ मार्च १८ पर्यंत!

By admin | Updated: July 1, 2017 02:46 IST

दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार

यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपयांवरील कृषी कर्जाची रक्कम फेडण्यासाठीची अंतिम तारीख ही ३१ मार्च २०१८ ही असेल. त्यामुळे मोठ्या रकमेचे थकबाकीदार असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शुक्रवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. दीड लाख रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी ज्या शेतकऱ्यांकडे आहे. त्यांनी अधिकची रक्कम भरली तर दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे २८ जून रोजी निघालेल्या कर्जमाफीच्या शासकीय आदेशात नमूद करण्यात आले होते. तथापि, ही अधिकची रक्कम कधीपर्यंत भरता येईल, याची कोणतीही मुदत त्या आदेशात देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले की, या थकबाकीच्या परतफेडीची मुदत ही ३१ मार्च २०१८ असेल. दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शासनाने सरसकट माफ केले आहे. त्याचा फायदा ३६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. दीड लाखावर कर्ज असलेल्या ८ लाख शेतकऱ्यांना अधिकची रक्कम भरताना तजविज करता येण्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यादृष्टीनेच पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जाणकारांच्या मते या निर्णयाने जसा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, तसा कर्जमाफीच्या निर्णयाने आर्थिक बोजाखाली दबलेल्या सरकारवर एकाचवेळी दडपण येणार नाही. ३६ लाख शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देताना सरकारवर मोठा बोजा येईल. त्याचवेळी दीड लाखावरील थकबाकीदारांना दोन महिन्यांची मुदत दिली असती आणि त्या मुदतीत त्यांनी थकबाकी परत केली असती तर सरकारवर एकाचवेळी मोठा आर्थिक ताण पडला असता. ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत दिल्याने आता तसे होणार नाही. ‘त्या’ परतफेडीला मिळणार मुदतवाढ -नियमित कर्ज परतफेड केल्यास २५ हजार रुपये वा थकबाकीच्या २५ टक्के यापैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून ज्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यांना परतफेडीची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. ही मुदत जूनअखेर होती. तरीही अनेक शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे शासन किमान एक महिन्याची मुदतवाढ देईल, अशी शक्यता आहे. या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, या परतफेडीचा आढावा घेऊन लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल. २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असे कर्जमाफीच्या आदेशात म्हटले होते. शेतकरी कर्जमाफीत घेणार जनतेच्या देणग्याराज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे, या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत असताना आता अशा देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्तींनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून ही रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणली जाईल.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये उऌकएऋ टकठकरळएफर ऋअफटएफ फएछकएऋ ऋवठऊ या नावाने ३६९७७०४४०८७ क्रमांकाचे खाते उघडण्यात आले आहे. या शाखेचा कोड ००३० आणि आयएफएससी कोड रइकठ ००००३०० असा आहे. या खात्यावर इच्छुक देणगीदारांना एनईएफटी अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.